
जेऊर कुंभारी वार्ताहर
आज जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना त्याचा परिणाम सर्वच घटकांवर दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने तथागत बुद्धांचे विचार जगाला देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे यांनी केले. भीमसाम्राज्य सेना जेऊर कुंभारी यांचे वतीने आयोजित भीम जयंती उत्सवामध्ये मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की आज जयंतीदिनी युवक वर्ग मोठ्या उत्साहाने मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहे ही बाब देखील महत्त्वाची आहे परंतु अलीकडील काळामध्ये तरुण पिढी व्यसनाधीनतेला बळी पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महामानवांच्या जयंती उत्सव साजरा करत असताना भीम साम्राज्य सेनेच्या वतीने दरवर्षी विचारांची देवाणघेवाण करून भंतेजी व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने होणाऱ्या ज्ञानदानातून प्रबोधनाचे कार्य केले जाते. हा भीम साम्राज्य सेनेचा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. संघटनेला आंबेडकरी चळवळीत नेता समजून नाही तर कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असणारे दीपकराव गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभते ही कौतुकाची बाब आहे असेही कोल्हे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मा.डिव्हिजनल मॅनेजर भिमराजजी वक्ते साहेब हे होते. कार्यक्रमाचे सुरुवातीस उपस्थित भीम अनुयायांकडून सामूहिक त्रिसरण पंचशील पठण करण्यात आले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गावातील चिमुकल्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आपले मनोगत तसेच नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आरपीआयचे राज्यसचिव तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दीपकराव गायकवाड यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. पूज्यनीय भंते आनंद सुमनसिरीजी व भंते कश्यपजी यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोपरगाव शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार साहेब,एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ औताडे, संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक रमेश घोडेराव, माजी संचालक मधुकरराव वक्ते, माजी व्हा.चेअरमन राजेंद्रजी गिरमे आदीं मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात भिमराज वक्ते यांनी युवकांनी बाबासाहेबांचा शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा हा उपदेश समजून घेऊन त्याच्या आचरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी स्मारक समितीचे बाबुराव काकडे,गौतम बँकेचे संचालक बापूसाहेब वक्ते, पोलिस पाटील बाबासाहेब गायकवाड, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा तालुका सचिव किशोर गायकवाड,कल्याणराव गुरसळ, महेंद्र वक्ते, खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन सुरेश पगारे,कोंडीराम वक्ते यांचे सह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मारक समितीचे वतीने भास्करराव वाकोडे यांनी उपस्थित उपस्थित यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित जनसमुदायाने भीम साम्राज्य सेनेचे वतीने आयोजित स्नेहभोजनाचा लाभ घेतला. तर सायंकाळी भव्य व आकर्षक मिरवणूक उत्साह व आनंदमय वातावरणात पार पडली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम साम्राज्य सेना मित्रमंडळाचे युवकांनी विशेष परिश्रम घेतले.


