
शहा-पोहेगाव ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीचा लोकार्पण सोहळा संपन्न!!
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा महामार्ग तसेच गावांतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण झाली असून वाड्या वस्त्यांवरच्या रस्त्यांना निधी दिला असून रस्त्यांसाठी अजूनही निधी मिळवीत आहे. जरी झगडेफाटा ते तालुका हद्द (भागवतवाडी) पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी निधी मिळविला असला तरी माझे समाधान झालेले नाही. एन.एच.७५२ जी या राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव पासून कोपरगाव पर्यंत सावळीविहीर-कोपरगाव सारखा सिमेंट काँक्रीटचा रस्ता कुठेच नाही. सध्या देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचेही सिमेंट काँक्रीटीकचे कामे प्रगतीपथावर आहे. त्याच धर्तीवर जोपर्यंत झगडेफाटा ते तालुका हद्दीपर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होत नाही तोपर्यंत माझे समाधान होणार नाही असे सुतोवाच करून झगडेफाटा ते वडगावपान रस्ता मलाच करावा लागणार आहे आणि रस्ता मीच करील कारण मी कामाचा माणूस आहे असा ठाम विश्वास आ.आशुतोष काळे यांनी पोहेगाव व पंचक्रोशीच्या गावातील नागरीकांना दिला.कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व परिसराचा विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून २.६० कोटी निधीतून करण्यात आलेल्या शहा सबस्टेशन ते पोहेगाव सबस्टेशनच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीचे लोकार्पण व १० लक्ष रुपयांच्या निधीतून साकारलेल्या श्री मयुरेश्वर देवस्थान परिसर विकास (पेव्हिंग ब्लॉक बसवणे) कामाचा लोकार्पण सोहळा गुरुवार (दि.०२) रोजी पोहेगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पोहेगाव परिसरातील नागरिकांचा आणि शेतकऱ्यांच्या विजेच्या अडचणी सोडविण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोळपेवाडी येथे १३२ के.व्ही.ए.चे सबस्टेशन मंजूर करून आणले होते. मात्र २०१४ नंतर कोपरगाव तालुक्यात सत्तांतर होवून हे सबस्टेशन शहा येथे घालविण्यात आले. तरीही या वीज उपकेंद्रावर तालुक्याचा हक्क अबाधित ठेऊन तालुक्यातील कोळपेवाडी व चासनळी ही उपकेंद्रे शहा सबस्टेशनला प्राधान्याने जोडून घेतले असून आज पोहेगाव वीज उपकेंद्र देखील शहा सबस्टेशनला जोडले गेल्याने परिसराचा विजेचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.
निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील ११ गावांना निळवंडे धरणाचे पाणी मिळाले पाहिजे आणि निळवंडे धरण ग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन व्हावे यासाठी कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली काळे समितीची स्थापना करण्यात आली होती. पुनर्वसन वेळेत झाल्यामुळे धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले असून राज्यात एकमेव निळवंडे धरणाचे काम पूर्ण होण्याच्या अगोदर धरणग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन झाले होते. जो पर्यंत निळवंडे धरणाचे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना मिळत नाही तो पर्यंत विरोधकांनी ज्या योजनेला न परवडणारी योजना म्हणून गुंडाळून ठेवली होती तीच उजनी उपसा जलसिंचन योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी या योजनेचे थकीत वीज बिल स्वखर्चातून भरून सुरु ठेवली त्यामुळे २००४ ते २०१४ या कालावधीत या गावातील नागरिकांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची अडचण भासली नाही. मात्र २०१४ ते २०१९ दुर्दैवाने हि योजना पुन्हा बंद ठेवली. मात्र २०१९ पासून मी पुन्हा उजनी उपसा जलसिंचन योजना सुरु केली यातून टप्पा १ मधील गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. टप्पा २ मधील गावांना निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध झाले असून अकरा गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता डी.डी. पाटील, कनिष्ठ अभियंता टर्ले, गवाळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविण शिंदे, संचालक शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, वसंतराव आभाळे,प्रशांत घुले गंगाधर औताडे, माजी व्हा.चेअरमन काकासाहेब जावळे, सचिन रोहमारे, सुनिल शिंदे, पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, अरुण येवले, वीरेंद्र शिंदे, भाऊसाहेब माळशिखरे, गौतम बँकेचे संचालक बाबुराव थोरात, बापूसाहेब जावळे, बापूसाहेब वक्ते, शरद होन, उत्तमराव भालेराव, जिनिंग प्रेसिंगचे व्हा. चेअरमन शंकरराव गुरसळ, गोदावरी खोरेचे संचालक दिलीप शिंदे, प्रदीप कुऱ्हाडे, रांजणगाव देशमुखचे सरपंच गजानन मते, डाऊचचे सरपंच संजय गुरसळ, चांदेकसारेचे सरपंच किरण होन, बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे, शहापूरचे सरपंच रमेश डांगे, घारीचे सरपंच संदिप पवार, आदींसह पोहेगाव व पंचक्रोशीतील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जे सबस्टेशन शहाला झाले ते सबस्टेशन कोळपेवाडीला होणार होते. त्यासाठी आपल्या कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने जवळपास सात एकर जागा एमएसबीला दिली होती. त्यामुळे कोपरगाव तालुक्याचा विजेचा प्रश्न पण सुटला असता आणि सभासद शेतकऱ्यांना ऊस दरात थोडे पैसे जास्त पण मिळाले असते. परंतु ज्यांनी ज्यांनी २०१४ ते २०१९ सत्तेत राहूनही ज्यांच्याकडे सांगण्यासारखे एकही ठोस काम नाही त्यांनी मा.आ.अशोकराव काळे यांना श्रेय मिळू नये यासाठी हे सबस्टेशन शहाला घालविले.


