
जेऊर कुंभारी वार्ताहर
परमार्थ हे महाधन आहे, परमार्थ धन देवापर्यंत घेऊन जाते म्हणून मनुष्य जीवनात परमार्थ फार महत्त्वाचा आहे, ज्या घरात परमार्थ धन आहे तेथे मिळवलेले धन टिकते, म्हणून संतांनी जे दिले ते अति श्रेष्ठ आहे. संत महात्मे हे समाजाला देण्यासाठी येत असतात असे प्रतिपादन
नेवासा चे ह.भ.प. दत्ता महाराज आयनर यांनी केले.
त्यांनी कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील मारूती मंदिरात हनुमान जयंती उत्सवा निमीत्ताने २ एप्रिल रोजी हनुमान जन्ममहोत्सव किर्तन सेवेत बोलत होते.
ह.भ.प. दत्ता महाराज आयनर पुढे म्हणाले की, अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजावर संतांचे उपकार आहेत महात्म्यांनी समाजाला जागविले आणि जगविलेही.तसेच
मनुष्य प्राण्यावर पाच प्रकारची ऋण असतात यामध्ये देव ऋण, ग्रंथ ऋण, संतांचे ऋण, भूत ऋण आणि आई वडील यांचे ऋण आहेत. मधमाशीचे जर इतके उपकार असेल तर या प्राणीमात्रांचे या जीवसृष्टीचे आपल्यावर किती उपकार आहेत याचा विचार मनुष्य प्राण्यांनी केला पाहिजे. जगातला कोणताच आनंद निरंतर नसतो अध्यात्माशी जोडलेल्या माणसांना मात्र निरंतर आनंद मिळत असतो बाह्य जगातला आनंद फक्त भास आहे आणि अध्यात्म सेवेतील आनंद निरंतर आनंद असतो.शेवटी
महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी जय बजरंग तरूण मंडळ,भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


