
कोपरगाव प्रतिनिधी
श्रीगणेश सहकारी साखर कारखाना येत्या हंगामात चार लाखाहुन अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या येत्या हंगामासाठीच्या रोलर पुजन कोल्हे यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.
गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधिर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे, सेक्रेटरी नितीन भोसले, जेष्ठ संचालक नारायणराव कार्ले, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, संचालक सर्वश्री बाबासाहेब डांगे, गंगाधर डांगे, संपतराव हिंगे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, महेंद्र गोर्डे, विष्णुपंत शेळके, अरविंदराव फोपसे, अरुंधतीताई फोपसे, अनिलराव गाढवे, संपतराव चौधरी, शोभाताई एकनाथराव गोंदकर, कमलाताई धनवटे, मधुकरराव सातव, आलेश कापसे, अनिलराव टिळेकर, ज्ञानदेव चोळके, गंगाधर चौधरी यांचेसह सभासद, शेतकरी, खातेप्रमुख, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात विवेक कोल्हे म्हणाले, व्यवस्थापन, ऊस उत्पादक, कामगार ही तीन चाकी गाडी आहे. या हंगामासाठी चांगले गाळप व्हावे म्हणुन कारखान्याच्या यंत्रातील रिपेअरिंग, मेंटेनन्स, तसेच आवश्यक त्या सर्व कामे पुर्ण केली जात आहे. शेतकी विभागाच्या माध्यमातुन ३ लाख ६० हजार मेट्रीक टन ऊसाच्या नोंदी कारखान्याकडे या हंगामासाठी झाल्या आहेत. या व्यतिरिक्त अतिरिक्त ऊस उपलब्ध करून हा गाळप हंगाम चार लाखाच्या पुढे नेता येईल यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
दैनंदिन ३ हजार मेट्रिक टन गाळप कसे होईल यासाठी कारखान्याच्या यंत्रात आवश्यक ते बदल करण्यात येत आहे. ऊस तोडणी कामगारांचेही ४ हजार मेट्रीक टन तोडला जावा यासाठी करार केले जात आहेत. १२० दिवसात ३ लाख ६० हजार ते ४ लाख मेट्रीक टन गाळप आपल्याला करायचे आहे. यासाठी आवश्यक ते मॉडिफिकेशन असतील, नव्याने जे काही उपाययोजना करण्याची गरज होती ते आपण केलेले आहे. काही कामे प्रगतीपथावर आहे. काही कामे पुर्णत्वास गेलेली आहेत.
कारखान्याचे बॉयलर पुजन समारंभ आपण मोठ्या स्वरुपात घेतो. जनरल मिटींग ही पुढील महिन्यात आहे. त्यांनतर सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे व उपासनी महाराज संस्थानच्या कन्यावृंदांच्या हस्ते आपण मोळीचा कार्यक्रम घेणार आहोत. यापुर्वीचे दोन हंगाम चांगले गेले. सर्वांनीच या हंगामांसाठी चांगली साथ दिली. या हंगामासाठीही चांगली साथ द्यावी, हा हंगाम चांगला पार पाडण्यासाठी कामगार आणि कारखाना प्रशासन यांचा समन्वयाने हा हंगाम गणपती बाप्पाच्या कृपेने चांगला पार पडेल असा विश्वासही श्री. कोल्हे यांनी व्यक्त केला.याप्रसंगी कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे म्हणाले, कारखान्याच्या ऊस गाळपाच्या उद्दिष्ठा साठी ४ लाख मेट्रीक टन ऊसाची उपलब्धता राहील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कारखाना पुर्ण क्षमतेने चालावा यासाठी कारखान्याने नियोजन केले आहे. पावसाने पाण्याची चांगली उपलब्धता झाल्याने कार्यक्षेत्रात ऊस लागवडी केल्या जाव्यात, यासाठी संचालक मंडळाने ऊस बेणे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऊस लागवडीच्या नोंदी कारखान्याकडे कराव्यात असेही श्री. शिंदे म्हणाले. सुत्रसंचालन सेक्रेटरी नितीन भोसले यांनी केले तर आभार संचालक अनिल गाढवे यांनी मानले.
याप्रसंगी भाऊसाहेब थेटे, सखाराम चौधरी, चंद्रभान गुंजाळ, योगेश निर्मळ, डॉ. लबडे, राजेंद्र लहारे, अनिल बोठे, धनंजय गाडेकर, चंद्रभान धनवटे, सदाशिव गाडेकर, उत्तमराव मते, रमेश गागरे, बी. एल. आहेर, सुरेश चौधरी, सुभाष कापसे, विनायक देठे, शेळके, अदि यावेळी उपस्थित होते.


