Saturday, April 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedदहावी व बारावीच्या परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित करू नये ; सुधाकर होन...

दहावी व बारावीच्या परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित करू नये ; सुधाकर होन यांची मागणी

जेऊर कुंभारी वार्ताहर

दि.१२ फेब्रु.पासून दहावी व दि.१८ फेब्रु.पासून बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असणाऱ्या या परीक्षा काळात विद्युत पुरवठा खंडित केला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, त्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित करू नये अशी मागणी चांदेकसारे येथील समाजीक कार्यकर्ते सुधाकर होन यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील रात्रीचा विद्युत पुरवठा खंडित केला जाऊ नये यासाठी आ.आशुतोष काळे प्रयत्नशील आहेत, मात्र वीज वितरण कंपनीकडून फारसे सहकार्य मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावी व बारावीचे वर्ष महत्वाचे असले तरी कधी नादुरुस्तीच्या तर कधी कमी दाबाच्या नावाखाली ऐन रात्रीच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर चांदेकसारे, पोहेगाव,जेऊर कुंभारी,कोकमठाण,
डाऊच खुर्द. डाऊच बुद्रुक, पानमळा या गावत काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे त्यामुळे शेतशिवारातील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने परीक्षा काळात वीज पुरवठा खंडीत करू नये अशी मागणी सुधाकर होन यांनी कोपरगावचे वीज वितरण अधिकारी यांचेकडे केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!