Saturday, April 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगाव तालुक्यातील पाच हजार हून अधिक घरकुलांचे स्वप्न झाले साकार, पंतप्रधान नरेंद्र...

कोपरगाव तालुक्यातील पाच हजार हून अधिक घरकुलांचे स्वप्न झाले साकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार!! – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यात अधिकाधिक लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने मा. आ. स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. शासन अनेक योजना गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांच्या सुख सुविधेसाठी राबवत आहे. गतवर्षी १६०० आणि चालू वर्षात ३५४१ असे पाच हजाराहून अधिक कोटा घरकुल योजनेला प्राप्त झाल्याने हजारो लाभार्थ्यांना पक्के घर मिळण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ होणार आहे.कोपरगाव तालुक्यातील अनेकांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी भरीव असा कोटा मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे अशी योजना राबवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना व्यापक स्वरूपात राबवली. या योजनेची अंमलबजावणी प्रत्येक गावात होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापक धोरण घेतले त्यानुसार हजारो लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळण्याचा ऐतिहासिक मंजुरीचा कोटा कोपरगाव तालुक्यासाठी आला आहे.
ड वर्ग यादीचा रखडलेला प्रश्न युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे मोर्चा काढत उचलला होता. वारंवार कोपरगाव तहसील येथे समस्या निवारण बैठकीत अधिकाऱ्यांना या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी व ऑटो डिलीट सारखी प्रक्रिया सुरू असताना त्यावेळी लाभार्थ्यांना वंचित रहावे लागेल असा नियम अडकाठी करू नका अशी विनंती प्रशासनाला केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वव्यापी धोरणामुळे कोपरगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी भरीव अशी ऐतिहासिक मंजुरी मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे गतिमान सरकार म्हणून नेहमीच ओळखले जाते. दूरदर्शी आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात भाजपा महायुतीची नेहमी ओळख राहिली आहे. जनतेच्या हिताचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी व तळागाळातील गोरगरीब समाजासाठी मोलाचे निर्णय घेण्यात सरकारचे धोरण यशस्वी ठरले आहे. कोपरगाव तालुक्यात अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयातून सहकार्य केले जाणार असून मंजूर यादीतील लाभार्थ्यांना प्राधान्याने हा कोटा पूर्ण करून भविष्यात उर्वरित मागणीनुसार सर्वच लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.
कोपरगाव मतदारसंघातील हजारो नागरिकांना हक्काचा पक्का निवारा उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र आणि राज्य सरकार यांचे मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने कोल्हे यांनी आभार व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!