
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी उजव्या कालव्यावरील.
सर्वात मोठी हरिसन ब्रँच चारीची पाटबंधारे खात्याने दुरुस्ती केली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. चारीचा अवाका व लाभक्षेत्र बघता रब्बी आवर्तन तातडीने सोडावे अशी मागणी महेंद्र वक्ते यांनी केली आहे.
तालुक्यातील जेऊर कुंभारी भागातील शेतकरी हरिसन ब्रँच चारीवर अवलंबून आहे. चारीला पाणी आले तरच विहीरीना पाणी महिना दिड महिना टिकून राहते. सध्या शेतात रब्बीचे पिके गहू, हरबरा, मका, कांदा ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. ही पिके पाटपाण्यावर अवलंबून आहे. आताची परिस्थिती बघता विहीरींनी तळ गाठला आहे. शेतीलाच नव्हे तर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. हरिसन ब्रँच चारीला पाणी आले तरच शेतकऱ्यांना आपल्या शेताला पाणी देता येते त्यामुळे परिसरासाठी हरिसन ब्रँच चारी वरदानच ठरत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी
रब्बीसाठी सात नंबर फार्म मोठ्या प्रमाणात भरले आहे. हरिसन ब्रँच चारीला जास्त दाबाने पाणी मिळाले तरच शेतकऱ्यांचे भरने होईल. गेल्या अनेक दिवसांपासून हरिसन ब्रँच चारी झाडे झुडपांच्या विळख्यात अडकली होती. चारीला पाणी आले तरी शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाणी मिळेपर्यंत मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत होता. पण दोन दिवसापासून हरिसन ब्रँच चारीची साफसफाई पाटबंधारे विभागाकडून केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदीचे वातावरण आहे. पूर्वी उजव्या कालव्यातून आवर्तन सुटल्यानंतर चितळीला पाणी पोहोचल्यानंतर चार ते पाच दिवसात हरिसन ब्रँच चारीला पाणी सोडले जायचे, आता पाटबंधारे विभागाने हरिसन ब्रँच चारीला पाणी
लवकरात लवकर सोडावे अशी मागणी महेंद्र वक्ते यांनी केली आहे




