

जेऊर कुंभारी वार्ताहर
नवभारत साक्षरता मिशन अंतर्गत नवसाक्षरांचा उल्लास मेळावा जि.प.प्राथमिक शाळा डाऊच बुद्रुक येथे शनिवार दि २८ डिसेंबर २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला.
मेळाव्याचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विस्तार अधिकारी श्रीम. पुजारी,सरपंच दिनेश गायकवाड व उपसरपंच भिवराजनाना दहे, योगेश दहे, कांतीलाल दहे, गणेश दहे, पवन दहे व नवसाक्षर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मान्यवरांचे हस्ते उल्लास विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील सर्व केंद्रातील शाळांनी विविध विषयांवर शैक्षणिक साहित्य निर्मिती करून स्टॉलची मांडणी केली होती. मान्यवरांनी स्टॉलला भेट देऊन स्टॉलची पाहणी केली व नवसाक्षरांचा उत्साह वाढवला . शालेय विद्यार्थ्यांनी साक्षरतेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम व पथनाट्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर मिठाचा शोध पाठाच्या लेखिका श्रीमती अंजली अत्रे यांनी आपले मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. विविध स्टॉलच्या माध्यमातून साहित्य हाताळून नवसाक्षरांना नवनवीन अनुभव मिळाला. याप्रसंगी केंद्रप्रमुख विलास भांड, श्रीमती शेळके, बाबाजी इरोळे, रावसाहेब लांडे, संजय महानुभव साहेब,विषय तज्ञ विवेक सोनवणे,संजय दहिफळे, संवत्सर शाळेचे मुख्याध्यापक फैय्याज पठाण, डाऊच बु॥ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. गवळी तालुक्यातील शिक्षक व नवसाक्षर उपस्थित होते.
डाऊच बु ॥ शाळेने उल्लास मेळाव्याचे नियोजन उत्कृष्ट केले होते.



