
कोपरगाव प्रतिनिधी
आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राजकीय नेत्यांना पत्रकारांची ताकद दाखवून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य मराठी पत्रकार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी केले आहे.
कोपरगाव येथे दिवाळीनिमित्त पत्रकारांना मिठाईचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
संघटनेच्या वतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा काढण्यात आली ही समाज यात्रा २८८ मतदारसंघातून मंत्रालय येथे नेण्यात आली असून
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने २४ मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला देण्यात आले होते त्यापैकी दोन मागण्या मान्य झाल्या असून उर्वरित मागण्या लवकरच मागण्या होतील असे यावेळी सांगितले.
प्रत्येक मतदारसंघात ५९ ते ६० पत्रकार असतात. त्यांच्याकडे सर्वसामान्यांचा मोठा संपर्क असतो. राज्यकर्त्यांनी आपल्या समस्याकडे लक्ष द्यावे म्हणून आपली ताकद दाखवून देण्याची गरज आहे.
सर्व पत्रकारांना महामंडळाच्या माध्यमातून फायदा होणार आहे .दोन्ही सभागृहात पत्रकारांच्या समस्या मांडण्यासाठी एक पत्रकार प्रतिनिधी असणे गरजेचे आहे.आपल्या हक्काचा आमदार मंडळात जाईल तेव्हाच आपल्या प्रश्नांचा विचार होईल परंतु सरकारचे सोयीनेच आमदार नियुक्ती केली जाते.
आपण संघटनेच्या माध्यमातून अनेक पत्रकारांना मदत केली आहे तो आपल्या संघटनेचा सभासद आहे किंवा नाही हे न पाहता मदत करण्याची भूमिका आहे. कोणीही आमदार होवो पण पत्रकारांचे प्रश्न मांडले पाहिजे यासाठी त्या त्या पक्षाच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा येणे गरजेचे आहे .पत्रकार इतरांचे, समाजाचे प्रश्न मांडत असतात परंतु पत्रकारांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणीही नाही यासाठी सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे.राज्यातील
अधिस्वीकृती धारक पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे .शासनाच्या जाचकाटीमुळे अनेक ज्येष्ठ पत्रकारांना त्रास सहन करावा लागत आहे या नियमात कुठेतरी बदल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, शहराध्यक्ष हफिज शेख, कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड, उपाध्यक्ष स्वप्नील कोपरे, प्रा.विजय कापसे,
ज्येष्ठ पत्रकार फकीरराव टेके, युसूफ रंगरेज, संतोष जाधव,सोमनाथ सोनपसारे, किसन पवार, विनोद जवरे, राहुल कोळगे, अमोल गायकवाड, सोमनाथ डफळ, राजेंद्र तासकर,रवींद्र जगताप, अक्षय काळे, काकासाहेब खर्डे, गणेश बत्तासे, मधुकर वक्ते, श्री डफळ आदी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.



