
कोपरगाव प्रतिनिधी
आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते, वीज, पाणी प्रश्न सोडवून नागरिकांचे जीवन सुखकर केले आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे हे खरे विकासपुरुष असल्याचे प्रतिपादन जेऊरकुंभारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
जेऊरकुंभारी गावातील रस्त्यांची अनेक वर्षापासून अतिशय बिकट अवस्था झाली होती. रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडली होती. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळणे अवघड झाले होते, अशा परिस्थितीत शेतकरी वर्गांला आपल्या शेतात जाणे येणे देखील कठीण झाले होते. मात्र आ.आशुतोष काळे यांनी पाच वर्षात
ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार करून ग्रामीण भागाचा कायापालट केला आहे. जेऊर कुंभारी परिसरातील जेऊरफाटा ते आंबेडकर पुतळा हा रस्ता प्रमुख गांव रस्ता असूनही या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली होती. मात्र आ.काळे यांनी या रस्त्यास तातडीने २० लाख रुपये निधी देऊन तो पूर्ण केला. भानुदास वक्ते वस्ती ते बोरावके वस्ती हरिसन ब्रँच लगत असणारा रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी नागरिकांची जुनी मागणी होती. या रस्त्यासाठीही आमदार महोदयांनी सुमारे ४७ लाख रूपये देऊन हे काम पूर्णत्वास नेले. जेऊर कुंभारी गावात सुमारे नऊ कोटी रुपये निधी देऊन भव्य गावातळे निर्माण करण्यात आले. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला असून महिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे. तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयास भरघोस निधी देवून त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. आ.काळे यांनी विशेषतः पाणी, वीज, रस्ते आरोग्य सुविधा यावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. कोकमठाण, चांदेकसारे, पोहेगाव, डाऊच खुर्द, डाऊच बुद्रुक, घारी, पानमळा, मुर्शतपुर, हिंगणी या गावतील रस्त्यांसाठीही भरघोस निधी उपलब्ध करून या गावांचे रूपडेच पालटले आहे. संपूर्ण मतदार संघात सर्वात जास्त
निधी आणण्याचा कदाचित त्यांचा पहिलाच बहुमान मिळवला आहे असे बाबुराव काकडे यांनी सांगितले.



