
जेऊर कुंभारी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी!!- महेंद्र वक्ते
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून
जेऊर कुंभारी ,चांदेकसारे, डाऊच खुर्द,घारी आदी करून गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
दि ६ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जेऊर कुंभारी येथील बापु गिरमे, सुरेश गिरमे
शिंदे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानाने हल्ला करून जागिच ठार केले आहे ही घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे.
मागील दोन वर्षापासुन जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे .रात्री अपरात्री बिबट्या शेतात फिरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे आत्ता पर्यंत बिबटयाने अनेक जनावरांचा बळी घेतला आहे त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान ही झालेले आहे तेव्हा वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत मार्फत वन विभागाला वेळोवेळी
लेखी निवेदन दिले आहे
बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश येत आहे. फक्त वेगवेगळी कारणे देऊन चालढकल करण्यात वनविभागाचे अधिकारी धन्यता मानत आहेत तर याचा काय उपयोग असा सवाल सोशल मिडियम कोपरगाव तालुका अध्यक्ष महेंद्र वक्ते यांनी उपस्थित केला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या बकऱ्या लहान लहान वासरे मृत्युमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तसेच मानवी जीवाला पण भीती निर्माण झाली आहे. शेळ्या बकऱ्या कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष्य करून मारून खात असल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.


