







जेऊर कुंभारी वार्ताहर
देशातील प्रत्येक नागरिक हा समाजाचा घटक आहे. गावाचा विकास झाला तरच समाजाचा विकास होतो. त्यामुळे नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे
ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन समाजीक कार्यकर्ते
कल्याणराव गुरसळ यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील कोळपेवाडी कारखान्याचे माजी संचालक
रामनाथ आव्हाड यांनी आपले वडील कै.फक्कडराव आव्हाड व मातोश्री गं.भा. मंजुळाबाई आव्हाड यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीसाठी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे बाकडे दिले याप्रसंगी बाकड्यांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, गावातील या दानशूर व्यक्तींमुळेच स्मशानभूमीचाच नव्हे तर गावाचा कायापालट झाला आहे ही नक्कीच अभिमानस्पद बाब आहे. आ.आशुतोष
काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर कुंभारी गावचे भुषण बाळासाहेब संपतराव बारसे यांची महात्मा गांधी चारिटेबल ट्रस्ट साईबाबा तपोभूमी व्यवस्थापन समिती ट्रस्टपदी निवड
झाल्याबद्दल आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने रामनाथ फक्कडराव आव्हाड व बाळासाहेब संपतराव बारसे यांचा कल्याण गुरसळ, बापूराव वक्ते,दिलीपराव शिंदे
यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब बारसे म्हणाले की, मला मिळालेला हा सन्मान सर्व ग्रामस्थांचा आहे, आ.आशुतोष काळे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यामुळे त्यांची कामे प्रामाणिकपणे पार पाडेल अशी ग्वाही दिली. या प्रसंगी गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक दिलीपराव शिंदे, गौतम बँकेचे संचालक बापूराव वक्ते, शरदचंद्र नागरी पतसंस्थेचे संचालक विरेंद्र शिंदे, माजी संचालक धोंडीराम वक्ते,कोपरगाव तालुका सोशल मिडिया अध्यक्ष महेंद्र वक्ते, कल्याणराव गुरसळ, संजय चव्हाण, भानुदास वक्ते, गोरख चव्हाण, किरण पाटीलबा वक्ते, किशोर वक्ते, सागर गुरसळ, केशवराव आबनावे, दत्तात्रय बारशे, यश गुरसळ ,आकाश लिंबोरे, आकाश देवकर, प्रवीण लकारे, राहुल गायकवाड, संग्राम माळी, राहुल लकारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्याने
उपस्थित होते. सुत्रसंचालन महेंद्र वक्ते यांनी केले तर आभार गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक दिलीपराव शिंदे यांनी मानले.


