
जेऊर कुंभारी वार्ताहर
पुणतांबा फाटा ते चांदेकसारे
या दरम्यान महामार्गाच्या कडेला दोन्ही बाजूस मोठ मोठ्या वेड्या बाभळीची झाडे रस्त्याच्या साईड पट्ट्या पर्यंत वाढल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना अडचणीचे ठरत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्याच्या कडेला वाढलेल्या वेड्या बाभळीची झाडे काढून साईड पट्ट्या मोकळ्या कराव्यात अशी मागणी जेऊर कुंभारी येथील पद्मविभूषण, डॉ शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थाचे संचालक विरेंद्र शिंदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
नुकताच पावसाळा चालू झाला आहे
रस्त्याच्या कडेला असलेली झाडे वाऱ्या वावधनामुळे रस्त्यावर आली आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे रस्त्याच्या दुतर्फा वाढल्यामुळे रस्त्याच्या साईड पट्ट्या दोन्ही बाजूने झाकून गेलेल्या आहेत त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना वाहन चालवणे मोठे अवघड झाले आहे या कारणाने त्यांना वाहन रस्त्याच्या मधोमध चालवावे लागते म्हणून चार चाकी वाहने व मोठी अवजड वाहने यांना वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते त्याचा त्यांना त्रास होतो. त्यातच दिशादर्शक व वाहतुकीचे नियमाचे दृष्टीने लावण्यात आलेले फलक देखील या झाडांमुळे झाकून गेलेले आहेत तसेच काही फलक जमिनीवर पडलेले आहे त्यामुळे वाहन चालवताना तीव्र वळण यासारख्या गोष्टीचा वाहन चालकांना अंदाज येत नाही त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. ही चिंतेची बाब आहे असे देखील पत्रकात नमूद केले आहे.
या मार्गावरून वाहनांची संख्या वाढली असल्याने वर्दळ खूपच वाढली आहे
गेल्याच वर्षी एका ऑटोरिक्षाच्या झालेल्या अपघातात सात निष्पाप माणसांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थिनी होत्या ही घटना ताजीच आहे त्यामुळे पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रस्त्याला दिशादर्शक फलक तसेच रहदारीच्या नियमांचे फलक योग्य ठिकाणी लावून साईड पट्ट्या त्वरित मोकळ्या करण्याची मागणी पत्रकाद्वारे विरेंद्र शिंदे यांनी केली आहे.


