
मागील ४ दिवसांपासून जे. कुंभारी गावातील काही युवकांनी एक मोहीम दोन मुद्द्यांवर चालवली मारूती मंदिर रस्ता व पेव्हर ब्लॉक संदर्भात. हे दोन मुद्दे फक्त निमित्त होतं यातून फक्त एकच गोष्ट दिसून आली ती म्हणजे अनिष्क्रियतता व टाळाटाळ. मनापासुन सांगतो हि मोहीम ना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभी होती ना विरोधकांच्या बाजूने. तसेच ही मोहीम ना कोणा वैयक्तिक व्यक्तीच्या विरोधात ना कोणा व्यक्तीला टार्गेट म्हणुन ना कोणाच्या दडपनावर ना कोणाच्या सांगण्यावरून ना कोणाच्या द्वेशापोटी. आम्हा युवकांचा विरोध अकार्यक्षम यंत्रणेला होता यंत्रणेला साधे प्रश्न होते पण जबाबदारीने कोणी पुढ आल नाही. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर गावातील एकही सदस्य देऊ शकला नाही विरोधक म्हणतात आमचे तर ३ नच सदस्य आहे आमचं कोणीच एकत नाही, अहो विरोधक तुमच काही चालत नाही ना असही राजीनामे द्या आणि घरी बसा नसती कारण देऊ नका हे एकण्यासाठी नाही पाठवत जनता तुम्हाला तेथे, बघु विरोधकांचे पुढील दोन दिवसांत किती राजीनामे येतात ते काही पण उगाचच. प्रत्येक जण म्हणतोय माझा तो वॉर्ड नाही माझा काही संबंध नाही मला माहीतच नाही काय चालु आहे ते अरे जर तुम्हाला काहीच माहीत नाही तर राजीनामे द्या ना असही काय उपयोग तुमचा सांगा बर विचारा स्वतःच्या मनाला?? दोष सदस्यां चा नाही जनतेचाही नाही. मी फक्तं चालु सदस्यंदाद्दलच बोलतोय असं नाही या अगोदर जे होउन गेले ते जे सध्या आहेत ते व जे कोणी भविष्यात येतील त्या सर्वांसाठी आमची हीच भुमिका हिच होती, आहे आणि हिच भूमिका राहणार. मला तर असही ऐकण्यास मिळालं युवा थांबले नाही तर कट कारस्थान करुन खोट्या केसेस ही त्यांच्यावर करणार पण त्या सर्वांना सांगू इच्छितो अहो तो शिकलेला युवक आहे हा युवक सक्षम युवक आहे २१ व्या शतकातला तो न घाबरणारा. विकास कामांसाठी लढतोय त्याच्या घराची काम करुन घेण्यासाठी नव्हे भान ठेवा जरा. ग्रामपंचायत गावचा कारभार आहे दडपण तर राहणारच ना तुमच्यावर, नसेल पेलवत तर राजीनामे देऊन घरी बसा. पण स्व हट्टासाठी गावच व जनतेच नुकसान का करता तुम्ही. तुमच्याही बुद्धी चालत नाही आणि तुम्ही जनातेचीही चालु देत नाही तुम्ही ठरवलं तरी काय??? ग्रामपंचायत हि फक्त जिरवा जिरवी साठी आहे असा प्रत्येकाने ट्रेंडचं बनवून टाकला आहे. अरे हुशार मनुष्या ग्रामपंचायत हि स्व विकासासाठी नसून गावच्या विकासासाठी शासनाने बनवलेली स्वतंत्र यंत्रणा आहे ती व्यापार किंवा व्यवसाय करण्यासाठीची तुझी जागा नव्हे. सन्मान करा त्या यंत्रणेचा, नसेल आत्तापर्यंत सन्मान करता आला तर यापुढे तरी कर वेड्यासारखं करू नकोस.
गावातूनच नाही तर तालुक्यातून हितचिंतक तसेच जाणून बुजून डीवचणाऱ्या अनेक लोकांचे फोन आले काही म्हणायचे तूम्ही युवक अगदी बरोबर आहे काही म्हणायचे भावी सरपंच काही म्हणायचे निवडणुकीची तयारी काही म्हणायचे लई पैशावला झाला का तु, त्या सर्वांना एकच सांगणं आहे आमची भूमिका यंत्रणा कशी सुधारेल यासाठी केलेली प्रामाणिक तळमळ होती ती. गावातील काही मंडळी नाराज झाली तर काहींनी आनंद लुटला तर काहींनी फक्तं टीगल्या घेतल्या तर काहींनी खिल्ली उडविली. पण माझं त्या सर्वांना एकच प्रश्न आहे तो म्हणजे तुमचं स्वतःच कर्तुत्व काय तुमची गावासाठी भूमिका काय आणि योगदान काय? अहो आम्ही युवक नाही सत्तेत नाही विरोधात नाही पदाधिकारी पण एक सामान्य नागरिक म्हणुन आमची भूमिका स्पष्ट न घाबरता न डगमगता न दबावाखाली स्पष्टपणे मांडतो तरी, तुमची बाजू तुमच्या अंतर्मनाला विचारा आपण कुठे???? सामान्य शिक्षित युवक आपल्या पुढं जातो की काय अशीच भिती निर्माण झाली आहे पण जे हिरे असतात ना ते चमकतातचं.
असो पण यातील अंतिम निष्कर्ष आमच्या अनुभवाप्रमाणे असा निघाला आत्तापर्यंत जे झालं ते झालं पण आमची व जनतेची भूमिका जे. कुंभारी ग्रामपंचायत बाबतीत यापुढे एकच असली पाहिजे ग्रामसभा देखील बोलावण्याची गरज माझ्या मते पडणार नाही व वादही होणार नाही. खालील मुद्दे ११ सदस्य- सरपंच – उपसरपंच किंवा जो कोणी गावातील इतर पडद्याआडून चालवणारा असेल त्या सर्वांसाठी राहील.
१. ज्या कोणाला पॅनल उभे करायचे त्यांनी प्रथम पाच
वर्षांचं बजेट वर्तमान पत्रकात किंवा मीडियाच्या
माध्यमातून गावातील जनतेला जाहीर करा.
२. गावातील प्रत्येक वॉर्डप्रमाने विकास कामे जाहीर करा.
३. निवडून आल्यानंतर कार्यभार स्वीकारण्या अगोदर
ग्रामपंचायत नावाने व्हॉट्स ॲप प्रमाणे ॲप तयार
करुन वरील बजेटची व वॉर्ड प्रमाणे जाहीर केलेली काम
त्यात टाकून ते ॲप गावातील जनतेपर्यंत पोहचेल अशी
यंत्रणा राबवा.
४. ग्रामपंचायत च्या मासिक मीटिंग लाईव्ह शक्य नसेल तर
व्हिडिओ रेकॉर्डिंग अंतर्गत घ्या व ती रेकॉर्डिंग तुम्ही
दिलेल्या ॲप मध्ये प्रत्येक मीटिंग नंतर जनतेपर्यंत पाठवा
त्यामुळे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी किंवा सदस्य
आपल्या वॉर्ड साठी काय भूमिका मांडतात ते
जनतेसमोर राहील.
जर आपली भूमिका सदस्य मांडत नसेल किंवा सादर
करत नसेल तर पाच वर्ष वाट पाहण्याची किंवा तु
राजीनामा दे म्हणायची जनतेला गरज पडणार नाही.
दिवसातून १० लोकानी जरी त्या सदस्याला व्हिडिओ
दाखवली तरी तो दुसऱ्यादिवशी राजीनामा न म्हणता
देईल. या सिस्टीम मुळे शून्य ग्यान असलेला उमेदवार
उभाच राहणार नाही किंवा कारभार माझ्याकडं द्या असं
म्हणुन दवंडी पिटवणार नाही.
५. दर तीन महिन्याला किती प्रस्ताव मांडले किती मंजूर
झाले किती पूर्ण झाले व किती रद्द झाले याचा अहवाल
ग्रामपंचायत ॲप मध्ये टाका. प्रस्ताव रद्द होवू द्या पण
कारण तर समजू द्या.
६. अहवालानंतर गावातील जनतेचा ग्रामपंचायत ॲप
प्रमाणे ज्या त्या वार्ड मधील सदस्याने फीडबॅक घ्या.
आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत सर्वच लागू करण यंत्रणेला शक्य नसतं हे आम्हीही व जनताही जाणते फक्त वरील ६ च बाबी लागू करा आम्ही जनता किंवा विरोधक तुमच्यापर्यंत येणारही नाही तुमच्या विरोधात बोंबळणारही नाही, तुमच्या विरोधात युवा मोहिमही नाही चालवणार, ग्रामसभा हि नकोत आम्हाला, तुम्ही आमच्या वॉर्ड मध्ये कामाचं नाही केल असही जनता नाही बोंबळणार. तुम्ही भ्रष्टाचार केला असही कोणी म्हणणार नाही, तुम्हीही फुगू नका आमच्यावर आम्हीही फुगानार नाही तुमच्यावर, भांडणही नाही गावात होणार. ज्याला चालवायची ना ग्रामपंचायत त्यानी चालवा पण याच पद्धतीनं.
आता ज्याला ताकत लावायची ना त्याने या पद्धतीनेच लावा बघू. जर नसेल मान्य तर तुम्हाला गावातील सर्व स्थरांतून विरोध होणार.
आहे का पारदर्शक कारभार करण्याची तुमची कोणाची तयारी ??
वरील पद्धतीने गावातील युवा आजच लढायला तयार आहे फक्त तुम्ही खाली या युवकांना तेथे जाऊ द्या आहे का तयारी तुमची फक्त जाहीर पणें सांगा, आमची युवा वर्गाची तर तयारी आहे.
नोट – १. यापेक्षाही उत्कृष्ट विचार एखाद्याचे असूही
शकतात.
२. ज्यांनी गावात काम केलीत त्यांचेही धन्यवाद व
सलाम तुमच्या कार्याला.
३. गावातील कोणाच्या भावना दुखावल्या असतील
तर युवा वर्गाकडून क्षमस्व.
!! जय हिंद जय महाराष्ट्र!!
लेखन – शशिकांत रामभाऊ वक्ते
संपर्क – ९९७०३१३१०२ / ७७६७८८४४८८
गाव – जेऊर कुंभारी, कोपरगांव.


