Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedऑल इंडिया किसान काँग्रेस कमिटीच्या कोपरगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन!!- विजय...

ऑल इंडिया किसान काँग्रेस कमिटीच्या कोपरगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना दिले निवेदन!!- विजय जाधव

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुका ऑल इंडिया किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव तालुक्यातील ऊस सभासदांना साखर मोफत मिळावी, कोपरगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची १००% रक्कम त्वरित मिळावी, गंगापूर, दारणा, भंडारदरा, निळवंडे, मुळा, नांदूर मधमेश्वर या धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नये, नगर मनमाड रस्त्याचे काम त्वरित चालू करावे, सोयाबीन कापूस या पिकांचे हमीभाव खरेदी केंद्र त्वरित चालू करावे, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या वर कठोर कारवाई करावी, घरगुती वापरातील गॅस, डिझेल, पेट्रोलच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नोकर भरती करण्यात यावी राज्यातील जनतेचे जात निहाय जनगणना करून सर्व मागास वर्गांना आरक्षण लागू करावे कोपरगाव तालुक्यातील रस्ते निकृष्ट दर्जाची बनवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व त्याची खातेनिहाय चौकशी व्हावी व शेतकऱ्यांच्या नावावर अतिवृष्टीचे पैसे अजून जमा झालेले नाही त्याची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे पैसे लवकरात लवकर जमा व्हावे याबाबतचे निवेदन अहमदनगर ऑल इंडिया किसान काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सुधाकर जाधव यांनी दिलेल्या निवेदनात वरील मागण्या केल्या आहेत या निवेदनावर विकास आढाव नितीन शिंदे विठ्ठल आसणे अंबादास वडांगळे अभिजीत आव्हाड विलास रक्ताटे अनिल गायकवाड आदींनी सदरच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!