Monday, April 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यार्थ्यानीं देश विकासासाठी संकल्प करावा!!-पोलीस निरीक्षक.दौलतराव जाधव

विद्यार्थ्यानीं देश विकासासाठी संकल्प करावा!!-पोलीस निरीक्षक.दौलतराव जाधव

संत जनार्दन स्वामी महर्षी स्कूलमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

देश चालविण्याची जबाबदारी सर्व सामान्य नागरिक ते पंतप्रधाना पर्यंत प्रत्येकाची असते प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जोपासणे गरजेचे आहे यासाठी विद्यार्थ्यांनी देश विकासासाठी संकल्प करावा असे प्रतीप्रादन पोलीस
निरीक्षक दौलत जाधव यांनी कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महर्षी स्कूल येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यानां मार्गदर्शन करतांना केले या प्रसंगी कोपरगाव पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या प्रमुख उपस्थीतीत व संत जनार्दन स्वामी ट्रस्टचे विश्वस्त प. पु. रमेशगिरी महाराज, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते पा., सचिव
अंबादासजी अंत्रे, विश्वस्त अॅड. अनिल जाधव, शिवनाथ शिंदे तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीरंग झावरे,आदी मान्यवर व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. श्री. जाधव पुढे म्हणाले की विद्यार्थ्यानीं नियमित वाचन, अभ्यास तसेच कला -क्रीडाचा अभ्यास शालेय जिवनात करावा व आपण ज्या क्षेत्रात भविष्यामध्ये कार्य करताल ते प्रामाणिकपणे देश हितासाठी करावे भारतीय राज्य घटनेने सर्वानां मुलभूत अधिकार दिले असून त्या अधिकारांचा देश विकासासाठी उपयोग करावा या प्रसंगी प.पू. रमेशगिरीजी महाराज यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यानां प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी भारतीय राज्य घटनेचे महत्व विद्यार्थ्यानां सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी मार्चपास्ट करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच विद्यार्थ्यानी डंम्बेलस् कवायत व मानवी मनोऱ्याचे मनमोहक सादरीकरण करून उपस्थीतांची दाद मिळविली सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवप्रसाद घोडके, योगेश
बिडवे, गणेश वाकचौरे, प्रिया बोधक महेश शिंदे, इम्रान शेख, किशोर भोसले व आनंद दळवी यासह सर्वानी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. गायत्री पटेल व सौ.सारीका सोनवणे, संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थीनी कृतीका भालके, हर्षदा ठोंबरे, श्रध्दा ठोसर व ज्ञानेश्वरी जावळे यानीं केले तर आभार सौ. वनीता औताडे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!