
कोपरगाव प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार विवेक कोल्हे यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थित समाज बांधवांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या वेदनांना आवाज दिला. त्यांच्या लेखणीतून सामाजिक समता, बंधुता आणि स्वाभिमानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे आ. विवेक कोल्हे यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ ऑगस्ट हा लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.यासह डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे निर्माण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत असेही कोल्हे म्हणाले.माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जगातील सर्वप्रथम स्मारक कोपरगाव येथे उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण यावेळी उपस्थितांनी केली.जयंतीनिमित्त डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक येथे आयोजित रक्तदान शिबिरात आ. विवेक कोल्हे यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, असेही त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, भाजपा तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे, बबलूशेठ वाणी, दिलीप दारुणकर, विजय आढाव, राजेंद्र बागुल,संजय उदावंत, विनोद राक्षे, संतोष शिंदे, विक्रमादित्य सातभाई, कैलास मंजूळ, संदीप देवकर, आकाश वाजे, दत्तात्रय पगारे, संतोष चवंडके, गोपीनाथ गायकवाड, मयूर गायकवाड, गुर्मीतसिंग दडीयाल, इरफान कुरेशी, सोमनाथ म्हस्के, दीपक जपे, राहुल खरात, अल्ताफ कुरेशी, प्रशांत संत, हाजी फकीर मोहम्मद पहिलवान, संतोष शेजवळ, कलविंदरसिंग दडीयाल, निसार शेख, विजय चव्हाणके, रामचंद्र साळुंके, शफीकभाई सय्यद, सतीश रानोडे, धनंजय आढाव, शरद त्रिभुवन, खालिकभाई कुरेशी, सलीम पठाण, कैलास सोमासे, सुकदेव जाधव, सचिन त्रिभुवन, रोहित कनगरे, प्रभुदास पाखरे, संदीप निर्भवने, रवी शेलार, प्रदीप नवले, सिद्धांत सोनवणे, सोमनाथ लोहकरे, शंकर बोऱ्हाडे, सुजल चंदनशिव, अभिषेक मंजुळ, डॉ. किशोर नागरे, पांढरीनाथ वक्ते, चंद्रकांत वाघमारे, अजय शार्दुल, रावसाहेब साठे, बाळासाहेब पवार, संपत चंदनशिव, प्रतीक पगारे, सतीश चव्हाण, संतोषभाऊ आढाव, नाना भुजबळ, मुक्तार पठाण, लखन म्हस्के, भैय्या नागरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


