
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातून जात असलेला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील जेऊर कुंभारी शिवारात एक इंटरचेंज असून त्यासोबत एक टोलनाका आहे सदर टोलनाक्याचे जेऊर कुंभारी असे नामाकरण करावे अशी मागणी जेऊर कुंभारीच्या सरपंच सुवर्णा पवार यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते झाले आहे.त्यात नागपूर ते शिर्डी हा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या पाच तासात पूर्ण करण्यात येणार असून नुकतेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी बस या महामार्गावर धावली आहे या प्रकल्पासाठी जेऊर कुंभारी शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या असुन या नाम करणामुळे जेऊर कुंभारी गावाचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार आहे हि बाब जेऊर कुंभारीकरा साठी भुषणावह असल्याने आहे त्या अनुषंगाने या टोलनाक्यास जेऊर कुंभारीचे नाव द्यावे या मागणीने जोर धरलेला आहे तरी प्रशासनाने परिसरातील नागरिकांच्या भावनांचा आदर करून त्यांचे नामाकरण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने सरपंच सुवर्णा पवार यांनी केली आहे.


