
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच सदस्यपदासाठीचे मतदान दोन तीन दिवसावर आले असून या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या असुन त्या अनुषंगाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी डाऊच खुर्द गावात ग्रामपंचायत निवडणुक शांततेत पार पडावी संदर्भात शांततासभेचे आयोजन केले होते.
या सभेत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उमेदवाराने तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुक आयोगाने घालुन दिलेल्या आचारसंहीतेच्या नियमानुसार प्रचार करावा तसेच कोणत्याही उमेदवारा विषयी सोशल मिडीयावर वर वादग्रस्त पोस्ट टाकू नये आचारसंही तेचे काटेकोर पालन करावे तसे असे आढळल्यास त्या क्षणी तर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे
राजकारण दोन दिवसाचे असते पण त्यामुळे गावतील सबंध बिघडता कामा नये
उद्या दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रचारकालावधि संपत आहे तेव्हा सर्वांनी बॅनर काढावे मतदानाच्या दिवशी नागरिकांनी बूथ पासून १०० मीटर लांब
थांबावे मतदानाच्या दिवशी कुणीही दारू पिऊन येऊ नये आचार सहितेचे उल्लघन करू नये असे जर झाले तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असे वासुदेव दिसले साहेब यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच संजय गुरसळ, पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड ,तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीदास गुरसळ, शंकर गुरसळ दिगंबर गुरसळ भास्कर गुरसळ, पंकज पुंगळ
आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित.


