Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमृद्धी महामार्गवरील प्रस्तावीत टोलनाक्यावर स्थानिकांना प्राधान्य द्यावे!!- माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण

समृद्धी महामार्गवरील प्रस्तावीत टोलनाक्यावर स्थानिकांना प्राधान्य द्यावे!!- माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण

तहसीलदार विजय बोरूडे यांना दिले निवेदन!!

कोपरगाव प्रतिनिधी

जेऊर कुंभारी व कोकमठाण परिसरातील समृद्धी महामार्गवरील प्रस्तावित टोलनाक्यावर नोकरी संदर्भात स्थानिक बेरोजगार तरुणांना प्राधान्य द्यावे या संदर्भात जेऊर कुंभारी गावचे माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी आज दिनांक १५.११.२०२२ रोजी कोपरगावचे तहसीलदार विजय बोरूडे साहेब यांना निवेदन दिले आहे.
कोपरगाव तालुक्यात समुद्धी महामार्गचे काम अंतिम टप्प्यात आले असुन या महामार्गासाठी अनेक
शेतकऱ्यांना जमिनी दिल्या आहेत या महामार्गावर जेऊर कुंभारी परीसरात सर्कल या सर्कलवर टोलनाका प्रस्तावित आहे तरी या टोल नाक्यावर नोकरी संदर्भात स्थानिकांना प्राधान्य द्यावे त्यामुळे बेरोजगार तरूणांना या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध होईल तसेच ग्रामिण भागातील तरूणांच्या हाताला काम मिळाल्यास त्यांना नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज उरणार नाही.मागिल दोन वर्ष पासुन कोरोना महामारीने जगावर थैमान घातले होते त्यात अनेकांना आपल्या नौक-या गमावल्या होत्या तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.तेव्हा शासनाने या सर्व गोष्टी विचारात घेऊन जेऊर कुंभारी व कोकमठाण परिसरात समृद्धी महामार्गच्या
प्रस्तावीत टोलनाक्यावर स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी जेऊर कुंभारी गावचे उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!