

राज कंट्रक्शन अधिकाऱ्यांनी घेतली दखल!!
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे नगर मनमाड या भागात दोन सर्कल तयार करण्यात आली आहे पावसामुळे पुलाखाली मोठमोठी खड्डे पडले आहे रस्ता की खड्डा हेच समजत नाही नागरिकांना प्रवास करताना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे २ ऑगस्ट रोजी महंत रामगिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह कोकणठाण परिसरात होणार आहे साईबाबा कॉर्नर ते कोकमठाण पर्यंत पायी दिंडी निघणार आहे या दिंडीतला लाखो भाविक येण्याची शक्यता आहे तेव्हा भाविकांना प्रवास करणे सोयीस्कर व्हावे.या पार्श्वभूमीवर जेऊर कुंभारी व कोकमठाण परिसरातील नागरिकांनी कोकणठाण सर्कल्पाशी रस्ता रोको केला तेव्हा जेऊर कुंभारी गावचे माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी समृद्धी महामार्गाच्या अधिकारी दत्ता माने व राजकंट्रक्शन चे अधिकारी रणजीतसर
यांना या गोष्टीची कल्पना दिली त्यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व सप्ताहस कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही अशी ग्वाही दिली.
तसेच त्वरित या सर्कल खालील रस्ता काँक्रिटीकरण केला जाईल असे सांगितले तेव्हा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व माजीउपसरपंच जालिंदर चव्हाण यांच्या आभार मानले .यावेळी माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण वैभव नेरकर आनंद बिडवे लखन बिडवे
गोकुळ नेहे किशोर माळवे कैलास वाघ वसंत त्रिभुवन सुनील अडांगळे दौलत वक्ते सुनील कवडेआदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


