Monday, April 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedना. आशुतोष काळेंचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या १३१ कोटीच्या पाणी योजनेच्या प्राथमिक कामास...

ना. आशुतोष काळेंचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या १३१ कोटीच्या पाणी योजनेच्या प्राथमिक कामास प्रत्यक्षात प्रारंभ!!

कोपरगाव प्रतिनिधी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. ५ नंबर साठवण तलाव हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्या ५ नंबर साठवण तलावाच्या १३१ कोटीच्या पाणी योजनेच्या प्राथमिक कामास प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न हे न सुटणारे कोडे होते. त्याबाबत अनेक आश्वासने दिली गेली मात्र कुणाकडूनही प्रत्यक्षात पूर्ण झालेली नव्हती. पाणी असूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नव्हते याचा सखोल अभ्यास करून ना. आशुतोष काळे यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वीच ५ नंबर साठवण तलावासाठी आग्रही भूमिका घेवून त्यासाठी केलेला संघर्ष आणि पाठपुरावा कोपरगाव शहरातील नागरिकांनी पाहिला आहे, अनुभवला आहे. हाती घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय सोडायचं नाही असा स्वभाव असलेल्या ना.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या सहकार्यातून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी तब्बल १३१.२४ कोटी निधी मंजूर करून अशक्यप्राय असलेले काम करून दाखविले. यामध्ये नवीन ५ नंबर साठवण तलावाच्या निर्मितीबरोबरच, ९५ किलोमीटरची नवीन पाईपलाईन, पाणी पुरवठा करणाऱ्या १ ते ४ साठवण तलावांची दुरुस्ती तसेच कोपरगाव शहरातील संजयनगर, ब्रिजलाल नगर, गोरोबा नगर व मोहनीराज नगर या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे व लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती आदी कामांचा या योजनेत समावेश आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणी पुरवठा कसा होईल यासाठी ना. आशुतोष काळे प्रयत्नशील असून त्याबाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून आहेत. त्यामुळे या कामास प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. केव्हा होणार, केव्हा होणार अशी आशा लागून राहिलेल्या कोपरगाव शहरातील नागरिकांची प्रतीक्षा आता संपली असून पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी प्राथमिक चाचणीचे काम प्रत्यक्षात बुधवार (दि.२०) पासून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिक सुखावले आहेत. यावेळी यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस लचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, जावेद शेख, संदीप कपीले, इम्तियाज अत्तार, राजेंद्र आभाळे, हारुन शेख, सचिन गवारे, रहेमान कुरेशी, जलील अत्तार, मनोज शिंदे, राजु उशिरे, संजय दुशिंग, बाळासाहेब सोनटक्के, विकास बेंद्रे, शंकरराव घोडेराव, शाहरुख शेख, मोबिन शेख, फकिर चंदनशिव, राजू बागवान, ईश्वर शिंदे, मुक्तार शहा, संतोष मरसाळे, सचिन फुलवट, निसा कुरेशी, रज्जाक कुरेशी, निहाल शेख, आतिफ शेख, रशीद कुरेशी, फिरोज शहा, वाळीबा भाबड, राजु कांबळे, अक्ताफ अत्तार, सोहेल शेख, अमन बागवान, रजीम कुरेशी, नदीम कुरेशी, मुतजीर कुरेशी, समीर कुरेशी, अकबर कुरेशी, जुनेद शेख, अभिषेक मगर, भिवसेन पवार, एकनाथ कुदळे, केदारनाथ बजाज, मारुती साळवे, संजय भावसार, किशोर बागुल, महेश पवार, लक्ष्मण भाटे, राजेंद्र सोनार आदी उपस्थित होते. रक्षाबंधनापूर्वीच ओवाळणी..
निवडणुका म्हटल्या की आश्वासन असतात. मात्र निवडणुकीपूर्वी शक्य असणारीच आश्वासने द्यायची असतात आणि ती आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण देखील करायची असतात. हे राजकारणात सर्वांनाच जमत नाही. बोटावर मोजता येणाऱ्या व्यक्तींनाच जमत. ज्यांच्या अंतरंगी समाजाप्रती तळमळ आहे अशाच व्यक्ती हे काम करू शकतात. ते काम ना. आशुतोष काळे यांनी करून दाखवलं आहे. कोपरगावचे नागरिक त्यांचे सदैव ऋणी राहतीलच मात्र एक महिला म्हणून सांगते पुढील महिन्यात असणाऱ्या रक्षाबंधनाची अनोखी ओवाळणी ना. आशुतोष काळे यांनी आम्हा माता-भगिनींना रक्षाबंधनापूर्वीच दिली आहे. – सौ.प्रतिभा शिलेदार (शहराध्यक्ष–राष्ट्रवादी महिला काँग्रेस)
१३१ कोटीच्या पाणी योजनेचे पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी प्राथमिक चाचणीचे काम सुरु.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!