


कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्रात अग्रगण्य असणारे प्रसिद्ध असे नावाजलेले सकाळ वृत्तपत्र यांनी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना मिळालेल्या आज परियन्तच्या नगराध्यक्षा मध्ये सर्वात कमी नगराध्यक्ष पदाच्या २००९ साली , अगदी कमी काळ ( साडेचार महिने फक्त ) या मिळालेल्या कार्यकाळात केलेल्या शहर विकासाच्यासाठी केलेले कामाचे / प्रयत्नाचे ,जेणेकरून गावाची बाजारपेठ वाढेल ,अश्या चांगल्या कामाबद्दल व ५ नंबर च्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तळ्यांच्या साठी उभारलेले जनआंदोलन व इतर करीत असलेल्या सामाजिक कामाची दखल घेवून आयडॉल महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित केले त्या बद्धल सकाळ समूहाचे पाटील यांनी मानले आभार..
कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाच्या आंदोलनात ज्या ज्या लोकांनी , संघटनांनी , विविध वृत्तपत्र , न्यूज चॅनेल , पत्रकार बांधव , पक्ष विरहित जाती निहाय पुढे यून , माता भगिनींनी सक्रिय सहभाग घेतला, त्या सर्वे नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानून पाटील यांनी अभिनंदन केले आणि म्हणाले की खरे पाण्याचे श्रेय हे सर्वांचे एकत्रीत जनतेचे / नागरिकांचे , लढ्याचे ,पाणी संघर्ष समिती चे आहे …
ते म्हणाले की , मी खूप आधीपासून ठाम पने ही गोस्ट सर्वांच्या निदर्शनास आणून देत होतो की येसगाव येथील २५ एकर जागेतील ५ नंबर साठवण तळ्यांचे काम झाल्यशिवाय कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटणार नाही.
मा. आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी मात्र ही गोस्ट गांभीर्याने लक्षात घेवून , त्याचा पाठपुरावा केला आणि येव्हडा प्रचंड निधी (१३१कोटी) आणला , त्या बद्धल त्यांचे खूप आभार.


