कोपरगाव प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व रहिवासीयांना २०२४ सालापर्यंत पाणी देण्यांसाठी जलजीवन मिशन योजना कार्यान्वीत केली असुन त्या अंतर्गतच तालुक्यातील राजंणगांव देशमुखसह अन्य सात गांवच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी ३५ कोटी ९८ लाख रूपयांची तांत्रीक मान्यता दिली आहे यात आमदार आशुतोष काळे यांचे कवडीचेही योगदान नाही अशा आशयाचे पत्रक प्रकाश काशिनाथ गोर्डे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. निधी मोदींचा अन डंका पवारांचा हे बरोबर नाही असेही ते म्हणाले.आमदार आशुतोष काळे व त्यांच्या प्रसिध्दी यंत्रणेने याअगोदरही शिंगणापुर, कारवाडी, कुंभारी, कोळपेवाडी, कोळगांवथडी, शहाजापुर, मढी बुद्रुक, हिंगणी, जेउरकुंभारी, देर्डे चांदवड, देर्डे को-हाळे, डाउच खुर्द यासह अन्य पिण्यांच्या पाण्यांच्या योजनांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जल जीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध करून दिलेला आहे, असे असतांनाही आमदार आशुतोष काळे व त्यांचे कार्यकर्ते स्वतःच श्रेय लाटत असेल तर ते बरोबर नाही., रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठीही जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निधी मिळालेला आहे, थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानण्याऐवजी त्यांनी मोदी व भाजपाचे आभार मानून पत्रकात थेट मोंदींनी हा निधी उपलब्ध करून दिला असे म्हणण्याची हिंमत दाखवायला पाहिजे होती. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन आमदार म्हणून या भागातील असंख्य प्रश्न थेट विधीमंडळ स्तरावर मांडुन त्याची सोडवणुक केली. याउलट माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या १९९९ ते २०१४ पर्यंतच्या १५ वर्षाच्या कालखंडात रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालवुन त्यावर अवलंबुन असलेल्या सात गांवाची तहान भागविली आहे. सत्ता नसतांनाही कोल्हे कुटूंबियांनी या भागातील रहिवासीयांना वा-यावर सोडलेले नाही. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी सातत्याने कारखान्याच्या विद्युत मोटारी सह आवश्यक ते मनुष्यबळ कर्मचारी वर्ग देऊन या योजनेतील सततच्या बिघाडाची दुरुस्ती करून
ही पाणीपुरवठा योजना चालू ठेवलेली आहे. मतदार संघातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत संबंधित अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांच्याशी सतत सौ स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी संपर्क साधून पाठपुरावा केलेला आहे. २०१४ मध्ये स्नेहलता कोल्हे यांना याभागाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनीही सदरची पाणी पुरवठा योजना चालवुन दाखविली आहे,. असे असतानाही विरोधक ही परिस्थिती का मान्य करत नाही, त्याविषयी जाहीर भाष्य करण्यास ते का टाळाटाळ करतात. याशिवाय रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल थकल्यामुळे त्याचा वीज पुरवठा खंडीत झाला होता त्याबाबत सौ कोल्हे यांनी पीडी झालेले वीज कनेक्शन थेट तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून ही योजना पुर्ववत चालु केली होती त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले हा विरोधकांचा कांगावा अत्यंत खोटा आहे., जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या पाच वर्षाचा सत्तेचा अपवाद वगळता कोल्हे यांनीच रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीत चालवली आहे, त्याची प्रशासकीय मान्यता देखील भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे हयाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुनच मिळविणार आहे, तेव्हा विरोधकांनी नुसत्या उलट्या बोंबा मारून रांजणगांव देशमुखसह परिसरातील नागरिकांची दिशाभुल करू नये असेही प्रकाश गोर्डे शेवटी म्हणाले.


