
कोपरगाव प्रतिनिधी
शहरातील साई आश्रया अनाथ आश्रमातील लहान मुले वयोवृद्ध यांच्या पाठीशी राहण्यासाठी समाजातील दानशूर भाविकांनी पुढे येण्याची गरज असुन त्यातुन मिळणारे समाधान फार मोठे असल्याची भावना पत्रकार राहुल कोळगे यांनी बोलताना सांगितले, सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून आई च्या पंधराव्या पुण्य स्मरणार्थ दोन सिलीग फॅन साई आश्रया अनाथ आश्रमाचे अध्यक्ष गणेश दळवी यांच्या कडे सुपूर्द केले . यावेळी मनोगत व्यक्त करताना पत्रकार राहुल कोळगे म्हणाले की समाजात रक्ताच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असताना गणेश दळवी सारखा तरुण १२०अनाथ लहान मुले मुली व ३० वयोवृद्ध महिला स्त्री पुरुष मंतीमंद लोकांचे पालकत्व घेऊन त्यांच्या पाठीशी राहुन करत असलेली सेवा कौतुकास्पद असून अशावेळी दानशूर लोकांचे सहकार्य मिळाले तर खऱ्या अर्थाने समाधान मिळू शकते कारण समाजात दिन दलित वंचित निराधार अनाथ यांच्या सेवेसाठी साईबाबा नी आपले आयुष्य याच शिर्डी च्या पावनभुमीत देउन जगाला सर्व धर्म समभाव तसेच श्रध्दा व सबुरीचा संदेश दिला अशा भुमित हे पुण्याचे काम सुरू असताना त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार व हातभार लावला तर मोठे कार्य घडणार असुन त्यासाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे असे मत कोळगे यांनी व्यक्त केले यावेळी पत्रकार किशोर पाटणी, अशोक कोळगे , दिपक कोळगे रमेश कोळगे ,उमेश कोळगे, निलेश कोळगे, गौरव मोरे, आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.अनाथ आश्रमाला सढळ हाताने मदत करण्यास पुढे येणे हे सत्कार्य असल्याचे मत पत्रकार राहुल कोळगे यांनी व्यक्त केले याप्रसंगी कोळगे परिवार उपस्थित होते.


