
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगांव शहराच्या १३१ कोटींच्या मंजुर असलेल्या पाणी योजनेचे काम तत्काळ सुरु प्रक्रियेबाबत माहिती घेण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी साहेब यांची शहरातील सामाजिक कार्यकर्ते ,नागरीक यांनी भेट घेतली.
योजनेच्या शासकीय कार्यादेशानुसार योजना मंजुर झाल्याच्या दिवसापासून ९१ व्या दिवसांच्या आत हे काम प्रत्यक्ष सुरु करने बंधनकारक राहील तसेच या कालमर्यादेचे पालन माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी करण्याचे स्पष्ट आदेश त्यात शासनाने दिलेले आहेत.
२४ जुन २०२२ रोजी ९१ दिवस पुर्ण झालेले आहेत तरी देखिल प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्याने मुख्याधिकारी साहेब यांना याबाबत विचारणा केली .उत्तर देतांना त्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . अंतिम मंजुरीसाठी पाठवलेले आहे असे सांगीतले . तसेच एक महिण्यात प्रत्यक्षात काम सुरु होईल अश्याप्रकारची मा .मुख्याधिकारी साहेब यांनी माहिती दिली .
याप्रश्नी नागरीकांच्या भावना तिव्र आहेत ,भर पावसाळ्यात आठ दिवसातून एकदा पाणी मिळत आहे .
जर एक महिण्यात काम सुरू झाले नाही तर आम्ही सर्व नागरीक आंदोलनाचा मार्ग हाताळू असा इशारा सर्व नागरिकांनी मा. मुख्याधिकारी साहेब यांना दिला आहे .
सध्या पावसाळा सुरु झाला असल्याने कॅनॉलला नियमित पाणी सुरु आहे . त्यामुळे पाणी चार दिवसाआड करावे अशीही मागणी केली . कारण गेल्या वर्षी चार दिवसाआड पाणी होते .श्री. गोसावी साहेब मुख्याधिकारी म्हणून रुजु झाल्यानंतर आठ दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे .
याप्रसंगी राजेश मंटाला , संतोषभाऊ गंगवाल मनसे, कोपरगाव काँग्रेसचे,अध्यक्ष नितीनजी शिंदे , तुषार विध्वांस , ॲॅड. नितीनजी पोळ साहेब , किरणभाऊ बिडवे , शरदभाऊ खरात,
प्रसाद निकम , सिद्धार्थ शेळके , अमित आगलावे ,विद्रोही पत्रकार अकबरभाई , सामाजिक कार्यकर्ते निसारभाई , आतिश शिंदे , दिपकराव घोडले , मुन्ना पाटणी हे सर्व उपस्थित होते.


