Sunday, April 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedआई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा!-ना.आशुतोष काळे

आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा!-ना.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी


शिक्षण घेत असताना जिद्द व चिकाटी अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी स्वप्न पाहिलेले असते.ते स्वप्न पूर्ण करणे हे  प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले आहे.राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादिदी यांनी अध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून त्यांना बाळशास्त्री जांभेकर अध्यात्म गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व  पोलीस निरीक्षक संतोष पवार यांना विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी १० वी व १२ वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा देखील ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादिदी यांचे अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.त्या योगदाना बरोबरच सामाजिक बांधिलकी देखील त्यांनी जपली असून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा या गुणवंतांसाठी आशीर्वाद आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्या आहेत.या स्पर्धांना सामोरे जाण्याचे आवाहन जरी मोठे असले  कष्ट करण्याची तयारी ठेवा. पालकांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी त्याला कष्टाचं बळ द्या आणि आयुष्य उज्वल बनवा असे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले.
यावेळी मा. आ. सौ. स्नेहलता कोल्हे, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, स्वप्नील निखाडे, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, डॉ. दिपक नाईकवाडे, सौ. रेणुका कोल्हे, अशोक आव्हाटे, नारायण लांडगे, योगेश नरोडे, जावेद शेख, ठकाजी लासुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!