
कोपरगाव प्रतिनिधी
सहकार महर्षी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नुकतेच वयाच्या ९४व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने गोदावरी नदीपात्रात त्यांच्या आस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले
तसेच बुधवार दि २३ मार्च २०२२ रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तसेच अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक तथा शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे यांच्या सूचनेनुसार कोल्हे यांनी कोपरगाव च्या पंचक्रोशीतील पाण्याच्या उपलब्धतेसाठी प्रत्येक गावात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, दगडी साठवण बंधारे, मातीचे बंधारे शेततळी मोठ्या प्रमाणात बांधले असून त्यात त्यांच्या अस्थींचे विसर्जन व्हावे त्यानुसार जेऊर कुंभारी हद्दीतील गोदावरी नदीपात्रात विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे ,भागुजी भोंगळे
यांच्या हस्ते
शास्त्रशुद्ध पद्धतीने विधी करत
कोल्हे यांच्या अस्थीं कलशाचे
विसर्जन करत साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी विश्वात्मा जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे सरचिटणीस हनुमंत भोंगळे महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक
बाळासाहेब वक्ते माजी सभापती शिवाजी वक्ते,आरपीआय प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड विजय रोहम,माजी संचालक मधुकर वक्ते, माजी सरपंच विठ्ठलराव आव्हाड, आनंदा चव्हाण, रमेश वक्ते, सरपंच सुवर्ण पवार,उपसरपंच जालिंदर चव्हाण, कैलास वक्ते, अविनाश आव्हाड,रामभाऊ आव्हाड,
संजय वक्ते, प्रदिप गायकवाड, लकारे ताराचंद, गंगुबाई जाधव,
शशिकांत गुरसळ, रामभाऊ वक्ते, नवनाथ गायकवाड, भाऊसाहेब वक्ते, करणा वक्ते, सतीश पवार,
सागर गुरसळ, आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले की
साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब, शेतकरी वर्गाच्या उद्धारासाठी खर्च करत तालुक्याच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे.
माजी सभापती शिवाजी वक्ते यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा देत
जेऊर कुंभारी गावातील शेतीचा व पिण्याचा प्रश्न माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सोडवला आज त्यांच्या जाण्याने एक निष्ठावंत नेता हरवल असे सांगत श्रद्धांजली अर्पण केली.
विश्वात्मा जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे सरचिटणीस हनुमंत भोंगळे यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना सांगितले की, माजी मंत्री शंकरराव कोल्हे एक पांढर्या वेशातील संत पुरुष असून तालुक्याला लाभलेले एक अनमोल रत्न होते आणि ते आज आपल्यातून निघून गेल्याने संपूर्ण तालुका पोरका झाला.असे सांगत साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.


