
कोपरगाव प्रतिनिधी
१) कधी देणार खऱ्या विस्थापितांना खोका शॉप , गाळे व जे राहात होते त्यांना घरासाठी जागा ???
२) ज्या विकासाच्या नावावर अतिक्रमण काढले , तो विकास झालाच नाही , ना रस्ते मोठे झाले, ना गोरगरिबांना विस्थापिताना गाळे , खोका शॉप , बेघराना राहायला जागा मिळाली .

३) खरच विकासासाठी अतिक्रमण काढले , मग आज अखेर सर्वे रस्ते मोठे करून रुंदीकरण होऊन ,रस्त्याच्या कडेला पेविंग ब्लॉक , किंवा पाई चालणाऱ्या / शाळेतील मुलांना जानेयेने साठी / जेष्ठां ना चालण्यासाठी रस्त्याचे काम कुठे झालेत ?? धूळ सर्वे गावभर उडत आहे.
४) धारणगावं रोड , येवला रोड , बाजारतळ , बस स्टँड समोरील जागा , बैलगाडी तळ , मार्केट कमिटी समोरील रोड , इंदिरापथ , बैल बाजार रोड ,बस स्टँड / खंदक नाला रोड , मच्छी मार्केट , तहसील कार्यालय लागत / पोस्ट ऑफिस मागील भागात , नदीकाठी रोड , चौक ते अँम येस सीबी ( mseb) ऑफिस ते कोर्ट ईत्यादि अनेक भागातील छोटे दुकाने पाडून या ठिकाणी रस्ते आहे तसेच आहे.जागा तसाच पडल्या आहेत.
५) कधी होणार मोठे रस्ते / त्यालागत पादचारी मार्ग ?? कधी देणार छोटे खोका शॉप ?? कधी बांधणार पक्के गाळे ???
६) आज परियन्त विस्थापित आशेवर राहिले व नागरिक मोठे रस्ते होऊन गाव वाढेल , स्वछ होईल , धूळ मुक्त होईल या आशेवर होते .शहरातील नागरपालिकेच्या / शासनाच्या / जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या असणाऱ्या जागेवर शॉपिंग सेन्टर कधी होतील याची वाट नागरिक बघत होते.काहीच झाले नाही ???
७) खऱ्या विस्थापिततांची होळी झाली. भेघर झाले . महिला , मुले बाळे आक्रोश करून रडत होती , कसे होणार आपले , काही गाव सोडून गेले , काही कर्जबाजारी झाले , काही मेले , काही दुसऱ्या च्या हाताखाली काम करून कसे बसे कुटुंब चालवत आहेत , याच आशेवर की कधी तरी न्याय मिळेल व आपल्याला हक्काचे खोका शॉप , गाळा मिळेल , राहायला जागा मिळेल, पक्के घर मिळेल..
८) ना रस्ते मोठे झाले ना गाळे झाले ना शॉपिंग सेन्टर झाले…
९) जसे टिळक नगर च्या रोड च्या बाजूने व इंदोर गेम च्या बाजूला पत्र्या चे गाळे झाले , तसे छोटे छोटे गाळे होऊ शकतात, रस्ते छोटे न होऊ देता.
खरे तर हे सर्वे विस्थापित नगरपालिके च्या आशेवर आज अखेर आहेत की काही तरी होईल , करतील व नागरिकांना वाटले की मोठे रोड होतील , साईड पट्ट्या होतील , धूळ कमी होईल , गाळे होतील , परंतु फक्त आणि फक्त निराशा या दोघांच्या पदरी पडली ,आली..
दोन वर्षांपूर्वी ४/९/२०२० ला श्रमिकराज कामगार संघटने बरोबर, अजय विघे , गणेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यां च्या बरोबर नगरपालिकेला निवेदन ही दिले होते. तरी अजूनही नगरपालिकेने खरे विस्थापित यांची शहानिशा करून टप्याटप्याने का होईना , जसे जिथे शक्य होईल तिथे खोका शॉप , गाळे बांधून , ज्यांची घरे गेली त्यांना राहायला जागा देऊन, या विस्थापिताना न्याय मिळवून द्यावा ही विनंती.


