जेउर कुंभारी ग्रामस्थ अंदोलनाच्या पविञ्यात
कोपरगाव तालुका प्रतिनिधी – मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाच्या कामांमुळे कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरातील रस्त्यांची दूरवृस्था झाली आहे. कंपनीकडे रस्ता दुरुस्ती बाबत वारंवार मागणी करुन देखील प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. २६ जानेवारीच्या आत रस्ता दुरुस्तीचे कामकाज सुरू करण्यात यावे अन्यथा समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडुन कंपनी विरोधात मोठे अंदोलन करण्यात येईल असा इशारा जेऊर कुंभारी गावातील नागरिकांनी दिला असुन त्याबाबतचे निवेदन देखील कोपरगांव शहरपोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.
गेल्या दोन तीन वर्षांपासून समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गासाठी साहित्य तसेच गौण खनिज वाहतुकीसाठी परिसरातील सर्व रस्त्यांचा वापर करण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने या रस्त्यांवरून रात्रंदिवस धावत असल्याने या सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र तरीदेखील रस्त्याची दयनीय अवस्था दूर होत नाही. निवेदन देत २६ जानेवारीपर्यंत नुकसान झालेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्तीचे कामकाज सुरु करणे बाबतचे मागणी केली आहे. याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास कंपनीचे सर्व कामकाज बंद पाडुन मोठे अंदोलन उभे करण्यात येइल असा इशारा देखील जेउर कुंभारी परिसरातील नागरिकांसह उपसरपंच जालिंदर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड यांनी दिला आहे.


