Thursday, April 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedवैशालीताई आभाळे यांना क्षितीजा महीला सन्मान पुरस्कार !!

वैशालीताई आभाळे यांना क्षितीजा महीला सन्मान पुरस्कार !!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द च्या माजी सरपंच सौ.वैशालीताई प्रमोद आभाळे यांना उमंग महीला फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा क्षितीजा महीला सन्मान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा दि.८ जानेवारी रोजी नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे झालेला असला तरी उमंग च्या अध्यक्षा सौ.विद्या सागर आहेर यांनी वैशालीताई आभाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना सदर बाब कोपरगाव तालुक्यातील माध्यमांना कळविली आहे.
या सोहळ्यामध्ये माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार तसेच संगमनेर च्या नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे,मुंबई एज्युकेशन ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.मिनाताई छगन भुजबळ व ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या विश्वस्त सौ.सुनंदा राजेंद्र पवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले
हा पुरस्कार सोहळा सौ.शोभाताई जयप्रकाश छाजेड यांच्या अध्यक्षतेखाली,स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील राणु आक्का अश्विनी महांगडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार अशोकदादा काळे,श्री.साईबाबा विश्वस्तव्यवस्था अध्यक्ष तथा विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे, प्रियदर्शनी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे,सौ.चैतालीताई आशुतोषदादा काळे व मढी खुर्द च्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!