
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील विविध गावांना जनसुविधा योजनेअंतर्गत ७१.१० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी दिली आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात निधी ग्रामीण भागातील अनेक गावांना दिला आहे. हा निधीचा ओघ नियमित पणे सुरु असून कोपरगाव तालुक्यातील शहापूर स्मशानभूमी ९.०० लाख, टाकळी ग्रामपंचायत कार्यालय ११.८० लाख, भोजडे स्मशानभूमी ५.९० लाख, कोकमठाण गाव अंतर्गत रस्ता ५.९० लाख, बक्तरपूर ग्रामपंचायत कार्यालय ११.८० लाख, संवत्सर गाव अंतर्गत रस्ता ११.९० लाख तसेच नागरी सुविधा योजने अंतर्गत संवत्सर येथील लक्ष्मी नगर परिसर सुशोभिकरण करणे साठी १४.८० लाख असा एकूण ७१.१० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
मागील पाच वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालना मिळाली. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातून सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य कोपरगाव तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणू शकले त्यामुळे बहुतांशी गावाचे विकासाचे प्रश्न मार्गी लागले असल्याचे सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी म्हटले आहे.


