
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावातील सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळन बंद करावे गावातील त्रस्त शेतकऱ्याने ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार जगासमोर मांडला तर आपण त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत विरोधक म्हणून घोषित केले हा कोणता न्याय ? आपणच लोकांना खोटी आश्वासने द्यायची व गाव डुक्कर मुक्त केले असे घोषित करायचे दोन डुकरे पकडून पेपर बाजी करून गाव डुक्कर मुक्त होत नाही हे पहिले ध्यानात घेतले पाहिजे. डुकरांनी दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले हे आपण त्यांच्या बांधावर जाऊन बघीतले का? आता तर असा संभ्रम निर्माण झाला की गाव घारभार कोण पाहत आहे? चांदेकसारे ग्रामपंचायतीचा कारभार कोण चालवत आहे. हे अगोदर स्पष्ट करून द्यावे सरपंच उपसरपंच यांच्या कामापेक्षा दुसरे स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यात दंग आहे.चांदेकसारे ग्रामपंचायतीने पेपर बाजी करण्यापेक्षा स्वतः कार्यक्षम होऊन गावाच्या विकासासाठी काम करावे जनतेला सगळे समजत आहे कोण काम करत आहे आणि कोण नाही चांदेकसारे गावात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्याला सहकार्य करण्यापेक्षा त्याच्यावरच शिंतोडे उडून सत्ताधारी आनंदाचे पेढे वाटत आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानाची पाहणी करावी मग बोलावे नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे गावात समृद्धी महामार्गाचे अधिकारी कोणाला घाबरत नाही दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या शेतात डंपरची वाहतूक करतात यामागे कोणाचा आशीर्वाद आहे हे अगोदर शोधले पाहिजे याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करा. आपला ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालू आहे हे सांगण्याची गरज नाही तेव्हा शेतकऱ्यांची बदनाम्या करणे बंद करा शेतकरी आपल्याला माफ करणार नाही ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते तो शेतकरी हळहळ व्यक्त करतो आणि आपण त्या बिचार्या शेतकऱ्याला खोटे ठरवून त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतात जनतेला सगळं समजत आहे आपण काय करीत आहे. चांदेकसारे गावात ग्रामपंचायतीचा कसा कारभार चालू आहे हे चांदेकसारे पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांना माहीत आहे.


शेतकरी शरद होन यांनी सांगितले यात विरोधकांचा नाव घेऊन शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये
माझ्या शेतीचे नुकसान झाले हे मी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पिकाचे नुकसान झाल्यावर शेतकरी हळहळ व्यक्त करतो हे सर्वांना माहीत आहे. शेतकरी मोठ्या कष्टाने आपले शेत फुलवत असतो आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे पिकाचे रक्षण करत असतो तेव्हा सत्ताधारी पक्षाने विरोधकांना बदनाम करू नये डुकरांचा कसा बंदोबस्त करता येईल याकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे असे मत शेतकरी शरद होन यांनी व्यक्त केले.


