Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedसौदर्य सम्राज्ञी सौ दीपिका आचार्य यांचा समता परिवाराच्या वतीने गुणगौरव!!

सौदर्य सम्राज्ञी सौ दीपिका आचार्य यांचा समता परिवाराच्या वतीने गुणगौरव!!

कोपरगाव प्रतिनिधी

समता परिवार नेहमीच कर्तृत्ववान महिलांना पाठबळ देऊन सदैव त्यांच्या पाठीशी काकांच्या रूपाने उभा असतो त्यासाठी त्यांनी कोपरगाव शहरात समता महिला बचत गटामार्फत सहकार उद्योग मंदिराचे उद्घाटन केले असून शहरातील व ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सबलीकरण आणि सक्षमीकरण केले जात आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी २०२१ च्या स्पर्धेतील महाविजेत्या सौ दीपाली आचार्य यांनी केले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ही बाल वयातच विद्यार्थ्यांचे  उपजत गुण विकसित होण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करून मोलाचे मार्गदर्शन समताच्या विद्यार्थ्यांना केले जाते. त्यामुळे समताचे विद्यार्थी नोकरी, व्यवसाय करता करता माझ्याप्रमाणे कला गुणांच्या आधारे विविध स्पर्धा मधून समताचे नाव सातासमुद्रापार घेऊन जातील. तसेच पोहणे या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पदक विजेत्या सौ सुषमा आचारी म्हणाल्या की, माझी स्नुषा म्हणून मला दीपालीचा सार्थ अभिमान आहे कारण ग्रामीण भागातील एक स्त्री वैद्यकीय शिक्षण घेऊन त्याच क्षेत्रात नावलौकिक मिळवत सांसारिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत स्वतःमधील गुण विकसित करत आज  महाराष्ट्रात सौंदर्य सम्राज्ञी म्हणून स्वतःच्या नावाबरोबरच कोपरगाव तालुक्याचेही नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. पुणे येथे अहिराणी कस्तुरी साहित्य व सांस्कृतिक कला क्रीडा मंचच्या वतीने आयोजित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा २०२१ मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करत सौ दीपाली आचार्य राज्यस्तरीय स्पर्धेच्या महाविजेत्या ठरल्या.त्यानिमित्ताने समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये डॉ दीपाली आचार्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजेत्या असलेल्या त्यांच्या सासू सौ सुषमा आचार्य यांचा सत्कार समता परिवाराचे संस्थापक,मार्गदर्शक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते गौरवचिन्ह,शाल श्रीफळ आणि गुच्छ देऊन करण्यात आला तर सत्कार मूर्ती सौ दीपाली आचार्य आणि सौ सुषमा आचार्य यांचा परिचय शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन यांनी करून दिला तर मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे यांनी स्वागत केले. प्रसंगी सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी भूषविले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात राहून डॉ दीपाली यांनी इतर महिलांना आदर्श ठरेल अशी कामगिरी केली असून त्यांच्या सासू सौ सुषमा आचार्य  यांनी देखील पोहणे या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे त्यामुळे सर्व कोपरगावकारांसाठी ही भूषणावह बाब आहे. प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, हितचिंतक, नातेवाईक उपस्थित होते.सदर सत्कार समारंभाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार शिक्षिका सौ शिल्पा वर्मा यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!