कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात देशपातळीवर कार्यान्वित होत असलेली ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत करण्यात आली असुन त्यामुळे गावातील चोरी.दरोडे तसेच समाज विघात कृत्यांना आळा बसण्या बरोबरच गावाला एक संघ ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आहे.किंवा गावच्या पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून रजिस्टर मोबाईल नाव नोंदणी केली जाते.त्यांनंतर
१८००२७०३६०० क्रमांकावर कॉल करून मदत मागितली जाते
या यंत्रणेतु ग्रामपंचायतीमधील सरकारी योजना,ग्रामसभा,रेशन रॉकेल व सरकारी कार्यालयाकडून दिली जाणारी माहिती,तसेच गावांमध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर चोरी दरोडा दागिने चोरीला जाणे महिलांची छेडछाड विषारी सर्पदंश बिबट्याचा हल्ला पिसाळ लेला कुत्रा गावामध्ये येणे निधन वार्ता इत्यादी इत्यादी माहिती एकाच वेळी सर्व नागरिकांपर्यंत सहज पोहोचवली जाणार आहे तेव्हा नागरिकांनी जास्तीत जास्त मोबाईल नोंदणी करावी असे आवाहन सरपंच सुवर्ण पवार, उपसरपंच जालिंदर चव्हाण, पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड,ग्रामसेवक केबी रणछोड ग्रामपंचायत सदस्य सदस्य यशवंत आव्हाड, प्रदिप गायकवाड,लकारे ताराचंद,किशोर वक्ते,अनिता वक्ते, जाधव गंगुबाई, वैशाली भोंगळे, धनश्री वक्ते, अनिता गायकवाड,क्लार्क आनंद बारसे
यांनी केले आहे.


