
जेऊर कुंभारी वार्ताहर
आषाढी एकादशीचे औचित्य साधून जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या बालदिंडीने संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजर आणि भक्तीरसात न्हाऊन निघाला. पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या बालवारकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकाराम जयघोष करत,बालवारकऱ्यांनी दिला स्वच्छतेचा आणि दिल्ली येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या अत्याचाराच्या निषेधार्थ संदेश दिला शिक्षण हा हक्क आहे बाजार नाही ,पेपर लिकला उत्तरदायित्तव हवे माऊली, शिक्षण वाचवा भविष्य वाचवा, प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय हवा विठ्ठला असा मोलाचा संदेश देऊन उपस्थितांची मन जिंकली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती दिंडीची आणि माहिती फलकाची सजावट!
ज्ञानोबा-तुकाराम, विठ्ठल-रुक्मिणीच्या गजरात निघालेल्या या बालदिंडीत शिक्षक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रांगोळ्या, फुलांची सजावट फुगड्या व गोल रिंगणामुळे दिंडीत अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या दिंडीत लहानगा हितांश बारसे विठ्ठलाच्या तर रक्षा दिघे रुक्मिणीच्या मनमोहक रूपात अवतरले होते.तर साईराज वक्ते आणि ध्रुवी गुरसळ या रूपातील विठ्ठल-रुक्मिणीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
विठ्ठल-रुक्मिणीची रीतसर पूजा आणि आरती संस्थेचे संचालक सागर होन आणि पल्लवी होन यांनी करून पालखीचे थाटात स्वागत केले. सचिव सुनील होन यांनी भक्त पुंडलिकाची कथा सांगून, निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
बालदिंडीनिमित्त शाळेतर्फे फराळ वाटप करण्यात आले.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन शितल होन यांनी केले तर आभार श्रावणी होन हिने केले.
या कार्यक्रमासाठी सचिव सुनील होन, संचालक सागर होन, प्राचार्या ज्योती खरात ,पल्लवी होन ,अश्विनी होन,स्वाती वक्ते,स्नेहल होन, मिनल बोरावके,शितल होन,सायली बोरावके,कविता लिंभूरे,रुपाली चव्हाण,रेश्मा जावळे,कांचन जाधव,दिलीप शिंदे,वैशाली गुंजाळ,संजना जेजुरकर इ.शिक्षक तसेच मुक्ता तुवर,रेणुका साळुंके,शिवाजी जाधव,सादिक सय्यद,अमोल कदम ,साई पवार इ. शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


