
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर
कुंभारी गावात बिबट्याचा वावर ही माहिती कळताच वनविभाग अधिकारी शितल कोटमे यांनी आज जेऊर कुंभारी गावात स्वतः येऊन पाहणी केली. यावेळी सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच जालिंदर चव्हाण, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, महेंद्र वक्ते, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, यशवंतराव आव्हाड,भाऊसाहेब वक्ते,मधुकर वक्ते, रूपेश लिंभुरे ,प्रवीण लिंभुरे, आकाश लिंभुरे ,योगेश लिंभुरे,यश गुरसळ, सुजीत वक्ते किरण वक्ते आदी उपस्थित होते. गेल्या तीन दिवसापासून बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रात्रीची थ्री फेज लाईट असल्यामुळे पाणी भरण्यास मजूर तयार नाही शेतीला पाणी द्यायचे कसे यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तेव्हा या बिबट्याला लवकरात लवकर जर बंद करावे व शेतकरी व ग्रामस्थ यांना या चिंतेतून मुक्त करावे असे सरपंच सुवर्णा पवार यांनी वन विभाग अधिकारी शितल कोटमे यांना सांगण्यात आले.


