
कोपरगावतालुक्यातील चांदेकसारे गावाला पाणी पुरवठा करणारी मेन पाईपलाईन समृद्धी महामार्गच्या अवजड वाहनाच्या वर्दळी मुळे फुटली आहे.त्यामुळे चांदेकसारे गावातील पाण्यापासून वंचित राहीले आहे. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच केशवराव होन यांनी तातडीने पाहणी करून पाईपलाईन युद्ध स्थरावर दुरूस्ती करण्यात यावी अन्यथा या घटनेची गंभीर दखल घेण्यात येईल असा इशारा गायत्री कंपनीला दिला आहे.
सध्या चांदेकसारे गावातून समृद्धी महामार्गाचे काम झपाट्याने चालू आहे. त्यामुळे त्यांच्या खडी क्रेशर पासून निघणाऱ्या मोठमोठ्या खडीचे डंपर, मोठी वाहने, चैन मशीन यामुळे चांदेकसारे गावाला पाणीपुरवठा करणारी मेन लाईन तुटली आहे त्यामुळे गावातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत चांदेकसारे च्या वतीने माजी सरपंच केशवराव होन यांनी समृद्धी महामार्गा चा ठेका घेतलेल्या गायत्री प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने त्वरित पाईपलाईनचे काम करून द्यावे अन्यथा याची गंभीर दखल घेण्यात येईल अशी तंबी केशवराव होन यांनी गायत्री कंपनीला दिली आहे. या घटनेची
पाहणी करताना माजी सरपंच केशवराव होन , धीरज बोरावके, रवींद्र खरात , सदाशिव बोरावके, गायत्री कंपनीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.



