Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिव्यांगांचे जीवन प्रकाशमय होणे गरजेचे!!- उपसरपंच जालिंदर चव्हाण

दिव्यांगांचे जीवन प्रकाशमय होणे गरजेचे!!- उपसरपंच जालिंदर चव्हाण

कोपरगाव प्रतिनिधी

दिव्यांग बांधवांचे जीवन प्रकाशमय होणे गरजेचे जेऊर कुंभारी चें उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी गावातील दिव्यांग बांधवांना मिठाई व फराळ वाटप प्रसंगी व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यात जेऊर कुभांरी गावातील उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी स्व-खर्चने
गावातील दिव्यांग बांधवांना दिवाळी निमीत्ताने मिठाई व फराळ वाटप करत त्यांची दिवाळी गोड केली आहे.
यावेळी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी बोलतांना सांगितले की संपूर्ण भारत देशात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. प्रत्येक जण आपापल्या परीने नवीन कपडे, फराळ फटाके फोडून साजरा करत असतो. आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने दिव्यांग बांधवांची देखील दिवाळी गोड करत त्यांना देखील फराळ मिठाई वाटप केले असून शासनाने देखील या दिव्यांग बांधवांचे जीवन प्रकाश मय होण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायला हवे शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करूण देणे गरजेचे आहे असे मत यावेळी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!