
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम जोरात मात्र शेतकरी कोमात !!
कोपरगाव प्रतिनिधी.
कोकणठाण हद्दीत बिडवे वस्ती रहिवाशी असून समृद्धी महामार्ग चा कामामुळे हरिसन ब्रॅचे ते गरुड फाटा ही पाटचारी प्रचलित असून या चारी ने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वापरता येते पण समृद्धी महामार्ग च्या कामामुळे गरुड फाटा ही पाटचारी बंद करण्यात आली आहे.
आनंद बिडवे, लखन बिडवे, प्रवीण बिडवे, गणेश बिडवे, यांनीही चारी उकरण्याची गायत्री कंपनीला विनंती केली परंतु याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले .गेल्या दोन दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे तीनचार येथील पाणी वाहत जाऊन सर्वे नंबर २५५ यात साचले आहे गायत्री कंपनीने पाटचारी बंद केल्यामुळे पुढे पाणी निघण्यास कोणतीही व्यवस्था केली नसल्यामुळे बिडवे यांच्या शेतात व घरात पाणी शिरले आहे. शेतात पाण्याचा अथांग समुद्र च जणु तयार झाला आहे त्यांचे उभे पीक पाण्याखाली गेले आहे जनावरांना चारा राहिला नाही विहिरीतून पाणी वाहू लागले आहे घरांमध्ये पाणी शिरले आहे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे तसेच त्यांच्या आरोग्याची व्यवस्था निर्माण झाली आहे त्यांचे आर्थिक नुकसान
मोठ्या प्रमाणात झाले आहे याचे सर्वस्वी जबाबदार गायत्री कंपनी आहे असे आनंद बिडवे लखन बिडवे प्रवीण बिडवे गणेश बिडवे नामदेव बिडवे विलास बिडवे यांनी सांगितले.
यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर पाण्यातच आम्ही कुटुंबासह
जलसमाधी घेऊन असा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.




