Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाझा ज्ञानोबा संत जिवनावरील एक अज्ञात सत्य सांगणारी कथा ! ! महंत...

माझा ज्ञानोबा संत जिवनावरील एक अज्ञात सत्य सांगणारी कथा ! ! महंत रमेशगिरीजी महाराज

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या उपस्थितीत माझा ज्ञानोबा मालीकेतील सर्व चमु चा सत्कार !!


कोपरगाव प्रतिनिधी


मायबोली या मनोरंजन करणाऱ्या मराठी दुरचित्रवाणी वाहनीवर दि.३० सप्टेंबर २०२१पासुन आठवड्यातील गुरुवार,शुक्रवार,शनिवार,रोजी रात्री ९.०० वाजता नव्याने प्रसारीत होत असलेली माझा ज्ञानोबा ही संत जिवनावर आधारीत एक अज्ञात सत्य सांगणारी,धाडसी मालिका असुन महाराष्ट्राच्या गौरवशाली संतपरंपरेचा इतिहास तसेच भक्तिचे महत्व जगाला पटवुन देणारी संत वाड्मय, वर आधारीत एक भक्ति मालिका आहे ती आपण हि पाहू व इतरांनीही पाहवी म्हणून आपण या मालिकेचा प्रसार करू,तसेच हि मालिका जास्ती जास्त प्रेक्षकां पर्यंत पोहचायला हवी आणी तेच”माझा ज्ञानोबा” मधील वारकऱ्यांच्या कष्टांचं फळ असेल. असे प्रतिपादन कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनारर्दन स्वामी आश्रमाचे महंत.रमेशगिरीजी महाराज यांनी केले आहे.
या मालिकेच्या संपूर्ण चमु चा महंत रमेशगीरी महाराज व माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे हसे सक्तार करण्यात आला
या सत्कार प्रसंगी आशिर्वाद देतांना ते बोलत होते
माझा ज्ञानोबा या मालिकेचे निर्माते कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे जन्मलेले जलाल महाराज सय्यद व प्रशांत पवार हे कोळपेवाडी येथील रहिवाशी असून आर्विक प्रोडक्शनच्या बॅनरखाली या मालिकेची निर्मित करण्यात आली आहे
पटकथा संवाद जलाल महाराज सय्यद यांचे तर मालिकेचे
सह निर्माते प्रमोद भळगट, ह.भ.प. शुभम पानगव्हाणे आहेत
कार्यकारी निर्माते सुमित पवार, सह पटकथा लेखक सुदर्शन खडांगळे संगीत संयोजन शामजी गोराणे,अरूण महाराज पगारे,कला दिग्ददर्शक रमेश टिक्कल सर,पार्श्वगायन रवी महाराज पवार,ज्योतीताई गौराणे,
सह संकलन सागर पवार यांनी केले असुन हे सर्व कोपरगावचे भुमिपुत्र आहेत तर
या मालिकेच च्या दिग्दर्शनाची महत्वाची जबाबदारी प्रमोद श्रीवास्तव यांनी चोख पार पाडली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे
हे सर्व वारकरी संप्रदायातील असुन यातील भूमिका करणारे बहुतांश कलाकारही वारकरीच आहेत. म्हणूनच “माझा ज्ञानोबा” ही मालिका एक इतिहासच आहे.
पैसा मिळवण्यासाठी नाही, ज्ञानेश्वर माऊलींच्या श्रद्धेपोटी. अज्ञात सत्य जगासमोर यावं यासाठी. “माझा ज्ञानोबा” च्या टीमने मोठी जबाबदारी घेतली आहे. टीव्ही, चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या गर्भश्रीमंत व्यक्तीलाही एकादी मालिका बनवताना प्रचंड अडचणी येतात. “माझा ज्ञानोबा” ची टीम तर वारकरी आहे. चित्रिकरणासाठी लागणारे तंत्रज्ञान, अर्थकरण, विषयाशी संबंधित साम्य असणाऱ्या वास्तू, नैसर्गिक स्थळे यांचे शोधकार्य, काही संदर्भांचे शोधकार्य इत्यादी कार्यामध्ये येणाऱ्या प्रचंड अडचणींवर मात करत या मालिकेची निर्मिती केल्याचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी यावेळी सांगीतले
या प्रसंगी मनोज कानडे,शंतनू गुरसळ आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!