
कोपरगाव प्रतिनिधी
शिर्डी येथील विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधांनी युक्त असे नवे शहर वसविण्यात येणार आहे. राज्यातील उत्तम विकास केंद्र म्हणून ते विकसित केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे जाहीर केले.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच ‘आशा’ असे या भागाचे नाव असेल. त्याचा नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास एमएडीसी करणार आहे.अशी माहिती मिळाली असुन यासाठी आपले धन्यवाद परंतु यापूर्वी शिर्डी विमानतळासाठी कोपरगाव तालुक्यातील जमिन विमानतळासाठी दिली आहे.परंतु कोपरगावचे नाव कुठेही येत नाही.यापूर्वी आम्ही शिर्डी विमानतळाचा नामविस्तार करून विमानतळाला कोपरगावचे नाव जोडावे अशी मागणी देशभक्ती सेवा मंचच्या माध्यमातून केली होती.यासदर्भात आम्ही आंदोलन देखील केले होते.राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवदेन देखील दिले होते.परंतु अद्याप शिर्डी विमानतळाचा नामविस्तार झाला नाही.आता नव्याने शहर बनविण्यात येत आहे.या एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच ‘आशा’ असे नाव देण्यात येत आहे.या नावाचा विस्तार करून या नावापुढे नविन कोपरगाव असा उल्लेख करावा.कारण यासाठी कोपरगाव तालुक्याच्या जमिनी मोठ्या प्रमाणात गेल्या आहे.कोपरगाव तालुक्याचे मोठे योगदान आहे.यासाठी आपण कोपरगावचे नावाचा उल्लेख करुन नामविस्तार करावा यासाठी देशभक्ती सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जगताप यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.




