Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedयेणाऱ्या निवडणुकीत पोहेगावचे राजकीय गणित बदलणार!!-नंदकिशोर औताडे

येणाऱ्या निवडणुकीत पोहेगावचे राजकीय गणित बदलणार!!-नंदकिशोर औताडे

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील पोहेगावाचे राजकीय समीकरण यापुढे पूर्णपणे बदलणार असून राज्यात निवडणूक विभागामार्फत राबवण्यात आलेल्या एसआयआर मोहिमेमुळे पोहेगावाच्या ६५७२ एकून मतदारांपैकी ८९४ दुबार मतदार कमी होऊन एकूण मतदार ५६७८ राहिले आहेत. पोहेगावातील एकूण सहा बूथ मधील प्रत्येक बूथमध्ये शंभरपेक्षा जास्त दुबार मतदार आढळून आले होते. हे दुबार मतदार कायमस्वरूपी कमी झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत राजकीय गणित पूर्णपणे बदलणार असल्याची सूचक टिपणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नंदकिशोर औताडे यांनी केली.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार निवडणूक विभागामार्फत देशभर राबविण्यात आलेल्या एसआयआर मोहिमेमुळे मतदार याद्या अत्यंत पारदर्शक आणि अचूक झाल्या असून अनेक दुबार मतदार या मोहिमेत आढळून आल्यामुळे या मतदारांना कुठल्याही एकाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळे मोहिमेमुळे वर्षानुवर्षे मतदार यादीत असलेली दुबार नावे पूर्णपणे हटवण्यात आली आहेत.
यामध्ये पोहेगाव गावातील २०१९ च्या मतदार यादी नुसार बूथ क्रमांक २१९ मध्ये पूर्वी १ हजार ३९ मतदार होते त्यापैकी १७२ दुबार मतदार कमी होऊन आता ८६७ मतदार राहिले आहेत. बूथ क्रमांक २२० मधील ९९६ मतदारांपैकी ११७ जणांची नावे कमी झाल्याने तेथे ८७९ मतदार राहिले आहेत. बूथ क्रमांक २२१ मधील १ हजार ५८ मतदारांपैकी १७१ मतदार कमी होऊन ८८७ मतदार आहेत. बूथ क्रमांक २२२ मध्ये १ हजार १६५ पैकी १७१ मतदार कमी झाल्याने ९८६ मतदार उरले आहेत. याशिवाय, बूथ क्रमांक २२३ मधील १ हजार १५५ पैकी १२६ मतदार कमी होऊन तेथे १ हजार २९ आणि बूथ क्रमांक २२४ मधील १ हजार १५९ पैकी १२९ दुबार मतदार हटवल्याने आता १ हजार ३० मतदार शिल्लक राहिले आहेत.
पोहेगावातील एकूण ६ हजार ५७२ मतदारांची एसआयआर मोहिमे अंतर्गत करण्यात आलेल्या छाननीत तब्बल ८९४ दुबार मतदार आढळून आल्यामुळे ते मतदार यादीतून कमी करण्यात आले. त्यामुळे आता पोहेगावची पात्र मतदारसंख्या ५ हजार ६७८ वर आली आहे. जेव्हा मतदार यादी पारदर्शक असते तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आत्मा टिकून राहतो. पोहेगावात केवळ पात्र आणि खऱ्या मतदारांचाच यादीत समावेश राहिल्याने येत्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरण पूर्णपणे बदलतील असे नंदकिशोर औताडे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!