Thursday, June 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedआ. आशुतोष काळे यांच्यामुळे हजारो दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर झाले!! -प्रवीण शिंदे

आ. आशुतोष काळे यांच्यामुळे हजारो दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर झाले!! -प्रवीण शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी

मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आ. आशुतोष काळे सातत्याने प्रयत्न करीत आहे. कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य वाटप शिबीर हा त्याचाच एक भाग असून यामुळे अनेक गरजू दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर झाले आहे. असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रविण शिंदे यांनी केले आहे.शारीरिक अपंगत्वावर मात करून दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई व आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बंधू भगिनींना मोफत कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्य वाटप शिबिराचे उद्घाटन गुरुवार (दि.२५) रोजी सकाळी १० वाजता कोपरगाव येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रविण शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.या शिबिराला उपस्थित असलेल्या दिव्यांग बंधू-भगिनींची सकाळी १० ते दु. ५ वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. संपूर्ण दिवसभरात शेकडो दिव्यांग बांधवांची तपासणी झाली असून ज्या दिव्यांग बंधू भगिनींना कृत्रिम अवयवांची गरज आहे. अशा दिव्यांगांना कृत्रिम अवयव अचूक बसावे याकरिता तज्ज्ञ डॉक्टरांकडून अचूक हाता- पायाच्या कृत्रिम अवयवाचे मोजमाप घेण्यात आले असून उपस्थित दिव्यांग बंधू भगिनींची नोंदणी देखील करून घेण्यात आली. या दिव्यांग बांधवांना शुक्रवार (दि.२६) रोजी दुपारी २ वाजता आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते कृत्रिम अवयवांसह व्हीलचेअर, ट्रायसिकल, कुबड्या, स्टिक, वॉकर, श्रवणयंत्र आदी सहाय्यक साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.अनेकदा आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे गरीब व गरजू दिव्यांगांना महागडे कृत्रिम अवयव, व्हीलचेअर किंवा इतर आधुनिक साधने खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचे जीवन परावलंबी बनते आणि दैनंदिन जीवन जगताना त्यांना सतत दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. दिव्यांग बांधवांची हीच मोठी अडचण ओळखून आमदार आशुतोष काळे यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून मतदारसंघातील शेकडो गरजवंत दिव्यांगांना थेट मदत पोहोचवून त्यांच्या अंधारमय जीवनाला एक नवी उमेद आणि नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे उद्योगसमूह व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे अधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!