
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील टाकळी-रवंदे (प्रजिमा ५) रस्त्यावरील टाकळी येथील मंडपी नाल्याला पावसाळ्यात पाणी आल्यानंतर नागरीकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी मंडपी नाल्यावरील पुलाच्या कामासाठी दिलेल्या १.२० कोटी निधीतून या पुलाचे काम अंतिम टप्यात आले आहे. सुरु असलेल्या कामाची आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी केली कामाच्या गुणवत्तेबाबत सूचना देत उर्वरित काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिले.अत्यंत जुना असलेल्या मंडपी नाल्याच्या पुलावर पावसाळ्यात जवळपास तीन ते चार फुट पाणी येत असल्याने टाकळी, रवंदे तसेच परिसरातील गावांचा संपर्क वारंवार खंडित होत असे. अनेक वेळा हा पूल ओलांडून जात असतांना पुलावरून वाहणारे पाणी कित्येक नागरीकांच्या जीवावर बेतले असता त्या जीवघेण्या संकटातून या नागरीकांचा कसा बसा जीव वाचला आहे. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यास, शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वर्षांपासून या नाल्यावर मोठ्या पुलाची मागणी नागरिकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत पुलासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
टाकळी परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या मागील कित्येक वर्षाच्या अडचणी कायमच्या दूर होणार आहेत. ग्रामीण भागातील रस्ते व पुल या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार असून पावसाळ्यात सातत्याने वाहतूकीची अडचण कायमस्वरूपी दूर होणार असल्यामुळे रवंदे-टाकळी व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रावण आसने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शशिकांत देवकर, विक्रम मांढरे, छगनराव देवकर, शिवाजीराव देवकर, दत्तात्रय देवकर,जितेंद्र देवकर,गणेश पळसकर,जगन्नाथ देवकर, राहुल सोनवणे, बाळासाहेब पाईक, भीमाजी पाईक, बाळासाहेब देवकर, संभाजीराव देवकर, ज्ञानेश्वर जेजुरकर,आसाराम देवकर, भाऊसाहेब देवकर, सुभाष देवकर, दिलीप देवकर,गणेश देवकर, संदिप सहानखोरे, सनी आव्हाड, सोमनाथ देवकर,अमोल देवकर,अक्षय देवकर,नामदेव देवकर,अनिल सोमासे, राजेंद्र देवकर,लालूभाई शेख, बाळासाहेब मालकर आदींसह ग्रामस्थ अधिकारी, संबंधित ठेकेदार उपस्थित होते.


