Saturday, August 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedशुद्ध गुळाच्या चवीने जिंकली ग्राहकांची मने; आता ‘कालांश’ची राज्यव्यापी भरारी!!

शुद्ध गुळाच्या चवीने जिंकली ग्राहकांची मने; आता ‘कालांश’ची राज्यव्यापी भरारी!!

कोपरगाव प्रतिनिधी

दर्जेदार उत्पादने, आकर्षक मार्जिन आणि व्यवसाय विस्ताराची सुवर्णसंधी; किराणा दुकानदार, सुपरमार्केट आणि उद्योजकांना मिळणार मोठा फायदा
विशेष प्रतिनिधी
आरोग्यदायी आणि पौष्टिक खाद्यपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘कालांश महिला गृहउद्योग / बचत गट’ने आपल्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या बळावर बाजारपेठेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शुद्ध गुळापासून तयार करण्यात येणारे ‘कालांश राजगिरा लाडू’ आणि ‘राजगिरा चिक्की’ हे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून आता या ब्रँडने महाराष्ट्रभर डीलरशिप आणि डिस्ट्रीब्युटरशिपच्या माध्यमातून व्यवसाय विस्ताराचे मोठे पाऊल उचलले आहे.
स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि नवउद्योजकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘कालांश’ ब्रँडने राज्यभरात वितरकांचे मजबूत जाळे उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे किराणा दुकानदार, सुपरमार्केट, मॉल तसेच स्वतंत्र वितरण व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.
व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर योजना
बाजारात राजगिरा लाडू आणि चिक्कीची मागणी मोठ्या प्रमाणावर असली तरी अनेक व्यापाऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नसल्याची समस्या कायम असते. याच पार्श्वभूमीवर ‘कालांश’ने व्यापाऱ्यांसाठी आकर्षक योजना जाहीर केली आहे.
‘कालांश’सोबत जोडल्यास मिळणारे प्रमुख फायदे
व्यापाऱ्यांना १५ ते २० टक्क्यांपर्यंत आकर्षक आणि खात्रीशीर मार्जिन.
बाजारातील इतर ब्रँड्सच्या तुलनेत स्पर्धात्मक दर.
एक्सपायरी मालावर १०० टक्के रिप्लेसमेंट गॅरंटी, त्यामुळे नुकसानाची चिंता नाही.
अतिरिक्त मालाचा दबाव किंवा डंपिंगची सक्ती नाही.
दरमहा जाहिरात आणि मार्केटिंगसाठी कंपनीकडून संपूर्ण सहकार्य.
ग्राहकांना आवडणारी चव, आकर्षक व स्वच्छ पॅकेजिंग आणि विश्वासार्ह गुणवत्ता.
गुणवत्ता आणि विश्वासाची परंपरा
‘कालांश’ उत्पादनांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शुद्ध गुळाचा वापर, उत्कृष्ट गुणवत्ता आणि आरोग्यदायी गुणधर्म. त्यामुळे ग्राहकांकडून या उत्पादनांना सातत्याने वाढता प्रतिसाद मिळत असून बाजारपेठेत त्यांची मागणीही वाढत आहे.
व्यवसाय विस्तारासाठी आवाहन
जर आपण किराणा दुकान, सुपरमार्केट किंवा मॉल चालवत असाल अथवा आपल्या परिसरात स्वतंत्र डिस्ट्रीब्युशन नेटवर्क उभारून नफ्याचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर ‘कालांश महिला गृहउद्योग व बचत गट’सोबत जोडण्याची ही योग्य वेळ आहे.
“जास्त गुणवत्ता, जास्त विश्वास आणि जास्त नफा” हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या ‘कालांश’कडून किराणा व्यावसायिक, सुपरमार्केट आणि वितरकांसाठी मर्यादित जागा उपलब्ध असून इच्छुकांनी त्वरित आपले क्षेत्र निश्चित करून या व्यवसाय संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!