Sunday, March 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedशेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे!!-ना. जयकुमार रावल

शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे!!-ना. जयकुमार रावल

कोपरगाव प्रतिनिधी

शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्याला सक्षम केल्यावरच राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. याच दृष्टिकोनातून राज्यातील ३०६ पैकी जवळपास १९० कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्यात येत आहे. तसेच, शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वाढवण बंदर परिसरात तब्बल १२०० एकर जागेवर पॅरिसच्या धर्तीवर जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने केला असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे भूमिपूजन व‌ विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ. स्नेहलताताई कोल्हे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे, कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, श्री गणेश कारखाना चेअरमन सुधीर लहारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,संचालक,आजी माजी नगरसेवक,विविध संस्थांचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी,व्यापारी,शेतकरी आदीसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सर्वत्र देशांमध्ये एलपीजीचा तुटवडा निर्माण होत असताना संजीवनीच्या रूपाने शेतकरी स्वतः गॅसची निर्मिती करत आहे ही मोठी बाब असून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होते आहे याचा आनंद देखील होतोय. शेतकरी केवळ अन्नदाता राहिला नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.आपल्या देशाला जर मजबूत करायचं असेल तर शेतकऱ्याला मजबूत करण क्रमप्राप्त आहे. खरंतर कोपरगावला फार मोठा चळवळीचा सहकार उद्योगाचा वारसा लाभला आहे. आणि नवीन उपक्रमांचा देखील आपल्याला वारसा लाभलेला आहे आणि तो वारसा पुढे नेत या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्र मध्ये निर्माण केली आहे.या मार्केट कमिटीचे सभापती तसेच सर्व संचालकांचे मी अभिनंदन करेल की त्यांनी बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तीन टर्म मार्केट कमिटी बिनविरोध केली. ही शेतकऱ्यांची मार्केट कमिटी असून आपापसातले मतभेद नसले पाहिजे, आणि म्हणून यामुळे पुढे विकासाला चालना मिळू शकेल. जवळजवळ या मार्केट कमिटीच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपयांचा वाढवा या ठिकाणी केलेला आहे. मागील तीन ते चार वर्षांमध्ये जवळपास 900 कोटीची उलाढाल कोपरगाव मार्केट कमिटीच्या माध्यमातून झालेली आहे.युवा नेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांची शिकवण होती की आपल्याला शेतकरी केंद्रबिंदू ठेवून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. स्व.कोल्हे साहेबांचे शिक्षण होऊन स्वतंत्र पूर्वकाळात ते परदेशात गेले. फोर्ड फाउंडेशनच्या माध्यमातून अमेरिकेला गेले शिक्षण पूर्ण केलं.त्या ठिकाणी शेतकरी कुटुंबासमवेत त्यांच वास्तव्य होतं. त्यानंतर स्वित्झर्लंडला जाऊन त्यांनी घड्याळाचा कारखाना टाकण्याच ठरवलं. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की ते तुला शिक्षण घेऊन आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांसाठी काय करता येईल ते डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या.कर्मवीर अण्णांसोबत रयत शिक्षण संस्थेत काम करून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन जाण्याचे काम केलेले आहे. अशा असंख्य एन एच सी सी सारख्या संस्था असतील ज्यामुळे सहकार तळागाळात गेला या सर्व संस्थांवर आदरणीय साहेबांनी काम केलं. त्या मागचा एकच हेतू होता की आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच त्या ठिकाणी झोपला पाहिजे 80% समाजकारण 20% राजकारण हे मंत्र घेऊन. स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांच्या आदर्श विचारधारेवर आम्ही काम करत आलेलो आहोत. कोपरगाव मार्केट कमिटीत देखील बिपीनदादा कोल्हे मार्गदर्शनाखाली सलग तीन वर्ष बिनविरोध निवडणूक केली. असे ते बोलताना म्हणाले. अमितभाई शाह यांनी केंद्रीय स्तरावर नेमल्या ncel सारख्या धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी शेतकरी सन्मान निधीसारख्या अनेक लाभदायक योजना सुरू करून शेतकरी हिताचे धोरण घेतले आहे.यावेळी बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, कोपरगाव मार्केट कमिटीच्या सलग तीन निवडणुका आम्ही बिनविरोध केल्या. त्याचा उद्देश एकच होता. की ही शेतकऱ्यांची संस्था आहे. आणि म्हणून या ठिकाणी राजकारण आणायचं नाही सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे.आमच्या मार्केट कमिटीने स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली जागा राहता मार्केट कमिटीला दिलेली आहे. स्वर्गीय कोल्हे साहेब स्व. काळे साहेबांच्या दूरदृष्टीतून आम्ही सलग तीन वेळा ही मार्केट कमिटी बिनविरोध केली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी स्वर्गीय कोल्हे साहेबांनी देशातील पहिला मोर्चा हा रिझर्व बँकेवरती रूमने मोर्चा काढला. तेव्हापासून देशातील संपूर्ण शेतकऱ्यांना कमीत कमी व्याज दराने कर्ज पुरवठा होऊ लागला. हे सर्व कोल्हे साहेबांमुळे झाले. महाराष्ट्र मध्ये फक्त काळे आणि कोल्हे यांचे कारखाने बिनविरोध का होतात तर स्वर्गीय काळे साहेब व कोल्हे साहेब हे जेष्ठ होते व त्यांची एक विचारसरणी होती की शेतकऱ्यांना विचार द्यायचा, विचारधारा द्यायची, शेतकरी हिताच्या दृष्टीने काम करून संस्था टिकवायच्या.आपल्याला संस्थेच्या ठिकाणी राजकारण आणलं नाही पाहिजे. आज या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सर्वांनी एकत्र रहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मा.आ.स्नेहलताताई कोल्हे म्हणाले की, बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगाव मार्केट कमिटीची निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मनाचा मोठेपणा सहकार क्षेत्र असेल शेतकऱ्यांच्या संबंधित विषय असतील पाण्याचे प्रश्न असतील राजकारण किती करावा आणि कुठे थांबव हे समजलं पाहिजे खरंतर म्हणून थोडं वाईटही वाटलं असून या कार्यक्रमास आमदार उपस्थित पाहिजे होते. ही बाजार समिती एकत्र येऊन बिनविरोध केली ते सर्व उपस्थित पाहिजे होती. सगळ्या जणांमध्ये मनाचा मोठेपणा नसतो असा टोला लगावला. संजीवनीच्या सीबीजी प्रकल्प उद्घाटनाच्या दरम्यान केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोल्हे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले की माझा पक्षाचा आमदार तुमच्या सहकार्याने निवडून आला. हा खरा मनाचा मोठेपणा आहे. म्हणून आम्ही स्वर्गीय अजितदादांचे भाषण कधीही विसरू शकत नाही. प्रत्येक कार्यकर्ता शेतकरी आमचा जिवाभावाचा आहे.अगदी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कार्यकाळापासून जोडलेला माणूस आमच्याशी जोडला गेलेला आहे. खूप जिवाभावाचा गोतावळा आहे. म्हणून आपले सर्वांचे एक वेगळे ऋणानुबंध आहे. म्हणून आम्ही कधीही कोण कोणत्या पक्षाचा बघत नाही. मी आमदार असताना कधीही असा प्रश्न कोणाला विचारलं नाही. लोकसेवा करण्याची संधी मिळाली असून आम्ही फक्त जनसेवा करण्याचा ध्यास ठेवला. यातून सामान्य माणसाचा प्रश्न सोडवता आला पाहिजे. यासाठी समोरील ते काम करायचं हाच आमचा मुख्य उद्देश होता. त्यावेळी माननीय मंत्री महोदय रावल साहेबांचं खूप सहकार्य झालं असे त्या बोलताना म्हणाल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!