Sunday, March 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिलेला शब्द न पाळणाऱ्या व गलिच्छ राजकारण करणाऱ्याबरोबर तडजोड नाही-उपसभापती गोवर्धन परजणे...

दिलेला शब्द न पाळणाऱ्या व गलिच्छ राजकारण करणाऱ्याबरोबर तडजोड नाही-उपसभापती गोवर्धन परजणे लोकप्रतिनिधी व इतर ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीबाबतचा जाहीर खुलासा करा!!

कोपरगाव प्रतिनिधी

मोठा गाजावाजा करून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध केल्याचे सांगतात. सहकारी गटांशी गोडबोलून सभापती पद पदरात पाडून घेतात, अडीच वर्ष सभापती पदाचा राजीनामा देण्याबाबत ठरल्याप्रमाणे सहा महिने होवूनही त्याबाबत चकार शब्द काढत नाही. कार्यक्रम पत्रिका छापतांना राजशिष्टाचार न पाळता सभापतीपदाचा गैर वापर करून ज्येष्ठांचा अनादर करतात. अशा कुटील राजकारण करणाऱ्यांशी दिलेला शब्द न पाळणाऱ्या व गलिच्छ राजकारण करणाऱ्याबरोबर कधीही तडजोड करणार नसल्याचे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, युवा नेते एकीकडे निवडणूक बिनविरोध केली असल्याचे सांगतात व यापुढेही सहकारात निवडणुका बिनविरोध करणार असल्याच्या वल्गना करतात. त्यांनी सहकाराच्या निवडणुकीत दिलेला शब्द न पाळण्याची परंपरा सुरु ठेवली याचे उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावे. निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे मी माझ्या अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या एक महिना अगोदरच माझ्या पदाचा राजीनामा दिला असून जवळपास सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु सत्तेचा हव्यासापायी आजतागायत माझा राजीनामा मंजूर केलेला नाही आणि त्यांच्या सभापतीपदाच्या राजीनाम्याबाबत देखील त्यांच्याकडून चकार शब्द काढला जात नाही, याचे पण उत्तर त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावे असा खडा सवाल उपसभापती गोवर्धन परजणे यांनी केला आहे.
कोणताही शासकीय, राजकीय कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात राजशिष्टाचारानुसार पालकमंत्री, माजी लोकप्रतिनिधी यांना त्या कार्यक्रमात योग्य तो मानसन्मान देणे गरजेचे आहे. परंतु कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत सत्तेच्या हव्यासापोटी व आपला मोठेपणा मिरविण्यासाठी राजशिष्टाचाराची तोडमोड केली हे सर्वसामान्य जनता कधीच मान्य करू शकत नाही. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनाच्या भुमीपुजन कार्यक्रमात काळे गटाचे उपसभापती व सर्व सदस्य अनुपस्थित राहण्याबाबत त्यांनी एक दिवस अगोदरच प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते त्यामुळे आ.आशुतोष काळे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत हे जवळपास निश्चित होते आणि घडलेही तसेच. परंतु या कार्यक्रमात आ.आशुतोष काळे व त्यांच्या गटाच्या सदस्यांबरोबरच मा.जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे व शिवसेना नेते नितीन औताडे यांच्यासह त्यांचे सर्व सदस्य व कार्यकर्तेही अनुपस्थित होते. यावरून काळे गटाने घेतलेल्या भूमिकेशी परजणे, औताडे गट एकप्रकारे सहमत आहे का? याबाबत तालुक्यात उलट सुलट चर्चांनी जोर धरला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!