
कोपरगाव प्रतिनिधी
ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन जिद्दीच्या जोरावर उभ्या केलेल्या उद्योगाचे यश आज थेट जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचले आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी माननीय श्री. पंकजजी आशिया यांनी नुकतीच धारणगाव येथील ‘कालांश राजगिरा लाडू’ महिला उद्योगाला सदिच्छा भेट दिली. यावेळी महिलांच्या कष्टाचे आणि त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी भरभरून कौतुक केले.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी लाडू निर्मितीची प्रक्रिया, स्वच्छता आणि गुणवत्तेची बारकाईने पाहणी केली. ग्रामीण भागातील महिला केवळ घर सांभाळून न थांबता आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. महिलांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असून, ‘कालांश’ ब्रँडने अल्पावधीत निर्माण केलेली ओळख कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रांत अधिकारी माननीय श्री. माणिकराव आहेर, तालुका कृषी अधिकारी माननीय श्री. मनोजजी सोनवणे, तहसीलदार माननीय श्री. महेशजी सावंत, कोपरगाव सर्कलचे माननीय श्री. मच्छिंद्रजी पोकळ आणि तलाठी धनंजय हाबड यांनी उपस्थित राहून महिलांचे मनोधैर्य वाढवले. तसेच कृषी विभागाच्या पोटे मॅडम, महावितरणचे किरणजी जावरे आणि बी. देशमुख साहेब यांनीही या उद्योगाची पाहणी करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कालांश राजगिरा लाडू उद्योगाचे प्रवर्तक माननीय श्री. रोहितजी काळे आणि श्री. विनयजी काळे यांनी सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी सरपंच माननीय श्री. दीपकजी चौधरी, सौ. अनिता मुंशी, सौ. मनीषा काळे, सौ. रेणुका काळे तसेच श्री. उमेश मोरे, ललित केदारी, आकाश रणशूर, मोहित कापसे आणि धारणगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. कालांश महिला बचत गट परिवारातील सदस्यांनी या भेटीमुळे आनंद व्यक्त केला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे उद्योगाला नवी उभारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.


