Thursday, April 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedअण्णाभाऊ साठे यांचे साहित्य सदैव प्रेरणादायी!!-दिपकराव गायकवाड

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य सदैव प्रेरणादायी!!-दिपकराव गायकवाड

जेऊर कुंभारी वार्ताहर

अण्णाभाऊ साठे हे थोर समाजसुधारक, लोककवी व लेखक होते. त्यांच्या लेखणीतून त्यांनी जातीभेदावर आणि सामाजिक विषमतेवर आवाज उठवला. त्यांचे साहित्य हे सदैव प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन आरपीआयचे राज्यसचिव दिपकराव गायकवाड यांनी केले. जेऊर कुंभारी संजयनगर येथे भीमसाम्राज्य सेना मित्र मंडळ व आरपीआय शाखेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना गायकवाड पुढे म्हणाले की अण्णाभाऊ यांनी गरीब, वंचित, कष्टकरी आणि शेतकरी वर्गाच्या हक्कांसाठी लढा दिला. आपल्या शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. त्यांच्या साहित्यातून अनेक सामाजिक विषयांना वाचा फुटली. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोक दारिद्र्य आणि अन्याया विरुद्ध लढण्यासाठी प्रेरित झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती उपाध्यक्ष बाबुराव काकडे, किसन गायकवाड, चांगदेव गायकवाड, संजय भालेराव ,बाळासाहेब पगारे, सतीश रणधीर, गोरख चव्हाण, संजय पाईक, किशोर खरात भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे संस्थापक प्रदीप गायकवाड कार्याध्यक्ष सुमित पगारे अध्यक्ष सागर गायकवाड,उपाध्यक्ष सागर जगताप , दाविद धीवर, प्रवीण गायकवाड, गोकुळ अहिरे, राहुल गायकवाड, स्वप्निल भालेराव,चांगदेव इस्ते, राज भालेराव, आकाश साळवे, भारत गायकवाड ,सोमनाथ जगताप ,विकी जगताप, अजय भवर ,जालिंदर इस्ते, अवि पगारे,विक्रम अहिरे ,विनायक बैरागी, मयुरेश काकडे आदीसह भीमसाम्राज्य सेना मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. गोकुळ अहिरे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रवीण गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!